कोलकाता: देशातील अनेक राज्यात नागरिकत्व कायद्या(CAA)विरोधात केला जात आहे. ईशान्य भारतासह पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे इंडियन प्रिमियर लीग (IPL)च्या पुढील वर्षी होणाऱ्या हंगामासाठीचा लिलाव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोलकाता शहरात १९ डिसेंबर रोजी आयपीएल २०२०साठी लिलाव होणार आहे. पण कोलकाता शहरातील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली पाठोपाठ कोलकाता शहरात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शहरात हिंसक आंदोलन सुरु आहे आणि तणावाचे वातावरण आहे. कोलकाता शहराकडे येणाऱ्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत १९ तारखेला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासंदर्भात चिंता लागली आहे.
वाचा-Video: १०२ मीटर गगनचुंबी सिक्सर; विराटही झाला अवाक!
या संदर्भात बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, काळजी करण्याचे फार कारण नाही. तेथील परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. गुरुवारी लिलाव होणार आहे. लिलावासंदर्भातील सर्व संघ मालक आणि अधिकारी मंगळवारी शहरात पोहोचतील. लिलाव झाल्यानंतर शुक्रवारी ते परत जातील. कोलकाता शहरातील माल्दा, मुर्शिदाबाद, हावडा, नार्थ २४ परगना आणि २४ परगना येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २० तारखेला पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्याची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नागरिकत्व कायद्या संदर्भातील रणनिती ठरवली जाणार आहे.
वाचा- पराभवानंतर देखील आनंदी आहे विराट; 'हे' आहे कारण!
कोलकाता शहरातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी अद्याप संघांच्या मालकांनी किंवा अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. येथील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी १९ डिसेंबरपासून लिलाव होणार आहे. यासाठी ९९७ खेळाडूंनी अर्ज केला होता. त्यामधून केवळ ३३२ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. या ३३२ जणांमधून ७३ जणांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
कोलकाता शहरात १९ डिसेंबर रोजी आयपीएल २०२०साठी लिलाव होणार आहे. पण कोलकाता शहरातील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली पाठोपाठ कोलकाता शहरात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शहरात हिंसक आंदोलन सुरु आहे आणि तणावाचे वातावरण आहे. कोलकाता शहराकडे येणाऱ्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत १९ तारखेला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासंदर्भात चिंता लागली आहे.
वाचा-Video: १०२ मीटर गगनचुंबी सिक्सर; विराटही झाला अवाक!
या संदर्भात बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, काळजी करण्याचे फार कारण नाही. तेथील परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. गुरुवारी लिलाव होणार आहे. लिलावासंदर्भातील सर्व संघ मालक आणि अधिकारी मंगळवारी शहरात पोहोचतील. लिलाव झाल्यानंतर शुक्रवारी ते परत जातील. कोलकाता शहरातील माल्दा, मुर्शिदाबाद, हावडा, नार्थ २४ परगना आणि २४ परगना येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २० तारखेला पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्याची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नागरिकत्व कायद्या संदर्भातील रणनिती ठरवली जाणार आहे.
वाचा- पराभवानंतर देखील आनंदी आहे विराट; 'हे' आहे कारण!
कोलकाता शहरातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी अद्याप संघांच्या मालकांनी किंवा अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. येथील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी १९ डिसेंबरपासून लिलाव होणार आहे. यासाठी ९९७ खेळाडूंनी अर्ज केला होता. त्यामधून केवळ ३३२ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. या ३३२ जणांमधून ७३ जणांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.