अ‍ॅपशहर

जसप्रीत बुमराला नेतृत्व स्विकारल्यावर इतिहास रचण्याची संधी, एकाही कर्णधाराला ही गोष्ट जमली नाही

रोहित शर्माची दुसरी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आता तो कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहितच्या गैरहजेरीत आता जसप्रीत बुमराकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पण नेतृत्व स्विकारल्यावर बुमराकडे आता इतिहास रचण्याची संधी आहे. बुमरा आपल्या पहिल्याच नेतृत्वाच्या सामन्यात कोणता इतिहास रचू शकतो ते जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 Jun 2022, 8:12 pm

हायलाइट्स:

  • जसप्रीत बुमराकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
  • नेतृत्व स्विकारल्यावर आता बुमराकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
  • बुमरा आता कोणता पराक्रम आपल्या पहिल्याच सामन्यात करू शकतो, जाणून घ्या...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जसप्रीत बुमरा (सौजन्य-ट्विटर)
लंडन : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे आता भारतीय संघाचे कर्णधारपर देण्यात आले आहे. पण भारताचे नेतृत्व स्विकारल्यावर बुमराला आता इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण भारताच्या एकाही कर्णधाराला आतापर्यंत एकदाही ही गोष्ट करता आलेली नाही.
जसप्रीत बुमरा आता कोणता पराक्रम करू शकतो, जाणून घ्या...रोहित शर्माची दुसरी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आणि त्यामुळेच त्याला कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळेच आता भारताचे नेतृत्व बुमराकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या दौऱ्यातील पाचवा आणि अखेरचा सामना हा करोनामुळे होऊ शकला नव्हता आणि तोच सामना आता यावर्षी खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाकडे २-१ अशी दमदार आघाडी आहे. त्यामुळे भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांची आघाडी वाढून ३-१ अशी होऊ शकते. दुसरीकडे भारताने हा सामना अनिर्णीत राखला तरी भारतीय संघ २-१ अशा फरकाने ही मालिका जिंकू शकतो. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत आघाडीवर आहे आणि त्यांना ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा ऐतिहासिक विजय साकारू शकतो. कारण यापूर्वी भारताच्या एकाही कर्णधाराला इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला किंवा अनिर्णीत जरी राखला तर इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकणारा बुमरा हा भारताचा पहिला कर्णधार ठरणार आहे. फक्त या सर्व गोष्टींमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे जर इंग्लंडच्या संघाने जर हा सामना जिंकला तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटू शकते. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने जर विजय मिळवला तर भारतीय संघाचे ऐतिहासिक विजयाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. एकिकडे इंग्लंडने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० अशी धुळ चारली आहे. त्यामुळे भारत त्यांचा हा विजयरथ रोखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज