अ‍ॅपशहर

बुमराह संघाबाहेर गेल्यावर नवीन खेळाडूची निवड का केली नाही, पाहा रोहित शर्माचा मोठा माइंड गेम

T20 WORLD CUP 2022 : बुमराच्या जागी विश्वचषकात कोणता खेळाडू खेळणार, याची उत्सुकता आता सर्वांना आहे. पण अजूनही खेळाडूची निवड का करण्यात आली नाही, याचे कारण आता समोर आले आहे. यावेळी रोहित शर्माचा माइंड गेम सुरु असून त्याला नेमकं काय वाटतं, याचे संकेत मिळाले आहेत. बुमराच्या जागी खेळाडू का निवडला नाही, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Oct 2022, 2:34 pm
नवी दिल्ली : जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आता बुमराच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड अजूनही करण्यात आलेली नाही. बुमराच्या जागी विश्वचषकात कोणता खेळाडू खेळणार, याची उत्सुकता आता सर्वांना आहे. पण अजूनही खेळाडूची निवड का करण्यात आली नाही, याचे कारण आता समोर आले आहे. यावेळी रोहित शर्माचा माइंड गेम सुरु असल्याचे पाहायला मिळाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम TEAM INDIA
सौजन्य-ट्विटर


अकदा का खेळाडू संघाबाहर गेला की त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड केली जाते. पण यावेळी मात्र तसे घडलेले नाही. बुमरा संघाबाहेर गेला तरी त्याच्या जागी अद्याप खेळाडूची निवड केलेली नाही. बुमराच्या जागी मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पण या तिघांपैकी कोणाची निवड होणार, हे मात्र अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

रोहित शर्मा यावेळी माइंड गेम खेळत असल्याचे समजत आहे. बुमराच्या जागी १५ सदस्यीय संघात त्याला मोहम्मद शमीलाच संधी द्यायची आहे, असे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे रोहित अजूनही शमी कधी फिट होतो, याकडे लक्ष लावून आहे. शमीला विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळेल, असे वाटत होते. पण त्याला करोना झाला. त्यानंतर त्याने उपचार घेतले आमि तो विश्रांती करत होता. त्यानंतर शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. सध्या तो अकादमीमध्येच आहे. पण त्याची फिटनेस टेस्ट अजूनही झालेली नाही. शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेका काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख