अ‍ॅपशहर

विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही झाली हकालपट्टी; गेलने 'या' भारतीय खेळाडूला दिला गुरुमंत्र

IPL 2022 : २०१९ च्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार होता, तेव्हा केएल राहुलला संघातून वगळण्यात आले. या स्टार फलंदाजासाठी हा खूप निराशाजनक अनुभव होता.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 30 Mar 2022, 6:15 pm
मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे (LSG) नेतृत्व करणारा के.एल. राहुल हा भारतीय क्रिकेटमधील अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याच्याकडे भविष्यात संघाची कमान सोपवण्याची शक्यता आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली, जेव्हा विश्वचषकात ३०० हून अधिक धावा करूनही त्याला संघातून वगळण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे तो खूपच निराश झाला होता. त्याला या निराशेतून बाहेर काढण्यासाठी आणि संघातील त्याचे स्थान पक्के करण्यासाठी कॅरेबियन दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने त्याला मदत केली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kl rahul reveals chris gayle 2019 advice on overcoming team india snub after he was dropped
विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही झाली हकालपट्टी; गेलने 'या' भारतीय खेळाडूला दिला गुरुमंत्र


केएल राहुलने क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूरला त्याच्या यूट्यूब शो 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मध्ये बोलताना हा किस्सा सांगितला. राहुलने भारताच्या कसोटी संघाची कमानही सांभाळली आहे. विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही त्याला वगळण्यात आल्याने तो खूप निराश झाला होता.

वाचा- 'वादच नाही, मला आरामात १५ कोटी मिळाले असते आणि कर्णधार देखील असतो'

२०१९ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी खूप चांगली होती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली, पण शिखर धवन जखमी झाल्याने त्यानंतर राहुलने सलामी दिली होती. या स्थानावरही त्याने चांगली फलंदाजी करत ९ सामन्यात ३६१ धावा केल्या, त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

विश्वचषकानंतर राहुल जेव्हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला, तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. संघातून वगळल्यानंतर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलशी काय संभाषण झाले ते राहुलने सांगितले.

वाचा- IPL 2022मधील मोठी कारवाई; कर्णधाराला केला १२ लाखांचा दंड, झाले तरी काय

के.एल. राहुलने गौरव कपूरला सांगितले की, "आम्ही २०१९ च्या विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलो होतो. मी विश्वचषकात चांगली कामगिरी केली, पण मला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली नाही. मी गेलला मेसेज केला आणि तो म्हणाला, पूलवर ये. गेलचा हा ३०० वा सामना होता आणि त्याबद्दल तो खूप आनंदी होता. तिथे त्याचे काही मित्र होते. मी तिथल्या पूलमध्ये गेलो आणि तो आला आणि माझ्यासोबत बसला. म्हणाला, तू का खेळत नाहीस?"

वाचा- IPL 2022मधील पहिला वाद, एकाने कॅच सोडला आणि...

राहुल पुढे म्हणाला, "मी याबद्दल गेलशी बोलत होतो आणि त्याने मला प्रत्येक सामन्यात शक्य तितक्या धावा करायला सांगितले. जर ७० धावा पुरेशा नसतील, तर १५० धावा करा. जर ते पुरेसे नसेल, तर २०० कर. विश्वचषकात तू ५०, ६० धावा केल्या होत्या आणि जर तू त्याचे १००-१२० मध्ये रूपांतर केले असते, तर तुला कोणीही बाहेर काढू शकले नसते''.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख