अ‍ॅपशहर

गरुडासारखी झेप अन् अनपेक्षित झेल पाहून सर्वच झाले थक्क, कोहली पण झाला चकित, पाहा VIDEO

Litton Das catch Ind vs Ban - बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिड एअर कॅच घेतला. हा झेल फॉर्मात असलेला भारतीय फलंदाज विराट कोहलीचा होता. विराटचा झेल पाहून त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2022, 5:24 pm
ढाका: भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. टी-20 विश्वचषकानंतर संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्याच्या वेळी भारताच्या सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण या सामन्यात भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीही मैदानात परतला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट सहाव्या षटकातच क्रीजवर आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India vs Bangladesh 1st ODI Litton Das catch


अनपेक्षित झेल

विराट कोहली खेळपट्टीवर आपला जम बसवू पाहत होता. रोहित बाद झाल्यानंतर कोहली मैदानावर असल्याने सर्वच निर्धास्त होते. परंतु दुसऱ्याच चेंडूवर त्याने शाकिब अल हसनचा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवून खेळण्याचा प्रयत्न केला. लिटन दास क्षेत्ररक्षण करत असलेल्या शॉर्ट कव्हरपासून चेंडू खूप दूर होता. पण त्याने हवेत झेपावत चेंडू पकडला. त्याने कधी झेल पकडला आणि क्षणार्धात काय घडले कळलेच नाही. विराट कोहलीचाही या झेलवर विश्वासच बसला नाही आणि तो काही वेळ क्रीजवर तसाच उभा राहिला. विराटने १५ चेंडूत ९ धावांची खेळी खेळली.

वाचा: राहुल इज बॅक! बांगलादेशमध्ये केएल राहुलची बॅट तळपली, एकट्यानेच सावरला भारताचा डाव

रोहितची बॅटही शांतच

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. ब्रेकनंतर आलेला रोहित सुरुवातीपासूनच शानदार फॉर्ममध्ये होता. पॉवरप्लेमध्येही तो झटपट धावा काढत होता. पण विराट कोहली बाद होण्याआधीच रोहित क्लीन बोल्ड झाला. शाकिबचा चेंडू बॅट आणि पॅडमधून बाहेर आला आणि त्याने थेट त्रिफळा उडवला. रोहितने ३१ चेंडूत २७ धावांची खेळी केली. या खेळीत रोहितच्या बॅटमधून ४ चौकार आणि ३ षटकार निघाले.

हेही वाचा: रोहितने येताच संपूर्ण संघच बदलला, वनडेमधून पंतचा पत्ता कट तर नव्या खेळाडूचे पदार्पण



१०० च्या आत ४ विकेट पडल्या

भारतीय संघाने ९२ धावांवर आपल्या टॉप चार फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. न्यूझीलंड दौऱ्यावर कर्णधार असलेला शिखर धवन या सामन्यात आपली विशेष खेळी दाखवू शकला नाही. १७ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यरच्या बॅटमधून २४ धावांची खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय संघ अनेक अष्टपैलू खेळाडूंसोबत खेळत होता. पण शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारताचे सर्वच खेळाडू झटपट तंबूत परतले.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख