अ‍ॅपशहर

बारामतीत नव्या पर्वाला सुरूवात; पवार म्हणाले, समाधान वाटले!

शरद पवारांनी त्यांचे बारामती शहराची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पवारांच्या या बारामती शहरात बुधवारपासून क्रीडा क्षेत्रातील एका नव्या पर्वाला सुरूवात झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2020, 1:43 pm
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खरी ओळख राजकीय नेता अशी असेल तरी पवारांचा वावर हा प्रत्येक क्षेत्रात असतो. पवारांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर काम केले आहे. क्रिकेट बाबत बोलायचे झाल्यास पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून ते भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचे अध्यक्षपद देखील सांभाळले आहे. याशिवाय ते खो-खो, कुस्ती संघटनेचे देखील अध्यक्ष आहेत. पवारांनी त्यांच्या बारामती शहराची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बारामती शहरात बुधवारपासून क्रीडा क्षेत्रातील एका नव्या पर्वाला सुरूवात झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sharad Pawar


बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून रणजी क्रिकेट सामन्याला सुरूवात झाली. महाराष्ट्र विरुद्ध उत्तारखंड यांच्यातील सामना बुधवारी सुरू झाला. सामना सुरू होण्याआधी पवारांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम देखील झाला.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, लारा क्या है मारा!

पवारांनी या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे पवारांनी म्हटले.



वाचा- आम्ही जिंकण्यास लायकच नाही; विराट अस्वस्थ

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात रणजी सामन्याचे आयोजन करण्यासंदर्भात बीसीसीआयच्या समितीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाहणी केली होती. त्यानंतर डॉ.आंबेडकर मैदानाला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा देण्यात आला.



सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या १० षटकात महाराष्ट्राने ५ बाद २९ धावा केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज