कोलकाता: आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सरकारच्या परवानगी शिवाय ठरवले जात नाहीत, असं सांगतानाच भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्यांचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोघे घेतील, असं बीसीसीआयचे संभाव्य अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं.
कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुलीने भारत-पाक सामन्याबाबत सावध भूमिका व्यक्त केली. भारत-पाकिस्तान संघादरम्यान क्रिकेट सामने होणार की नाहीत, हे तुम्ही मोदी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय सामने सरकारच्या परवानगी शिवाय होत नाहीत. आमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये, असं सौरव गांगुलीने सांगितलं.
टीम इंडियाने २००४मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात पाकिस्तानात वनडे आणि टेस्ट मालिका जिंकली होती. त्यावेळी १९८९नंतर पहिल्यांदा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. कारगिल युद्धानंतर (१९९९) नंतर दोन्ही देशांदरम्यान पहिली द्विपक्षीय मालिका पार पडली होती.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयने आयसीसीने एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी दहशतवाद वाढवणाऱ्या देशांशी संबंध तोडण्याचे आवाहन क्रिकेट समुदायाला केली होती. या पत्रात बीसीसीआयने विश्वचषकासहित आयसीसीच्या भविष्यातील होणाऱ्या क्रिकेट सामन्या दरम्यान क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली होती. मात्र, पत्रानंतरही आयसीसीने पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर केलं नव्हतं. बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यानंतर हे पत्र लिहिलं होतं. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
सौरव बीसीसीआयचा संभाव्य अध्यक्ष
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत सौरव गांगुली याचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. सौरव गांगुली आजच अर्ज दाखल करणार आहे. अन्य कुणाचाही अर्ज दाखल होण्याची शक्यता नसल्यानं गांगुलीची निवड केवळ औपचारिकता उरली आहे. या पार्श्वभूमीवर त्यानं प्रतिक्रिया दिली होती. 'मी याआधी देशासाठी खेळलो आहे. भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळं साहजिकच क्रिकेटशी संबंधित देशातील सर्वोच्च संघटनेचं काम करण्याची संधी मिळणं हे आनंद देणारी गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षांत बीसीसीआयला अनेक प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे. मंडळाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. ती प्रतिमा बदलण्याची संधी मला मिळाली आहे. बिनविरोध निवड होणं ही मोठी जबाबदारी आहे. आर्थिकदृष्ट्या भारत हे क्रिकेटचं शक्तिकेंद्र असल्यानं माझ्यापुढं एक आव्हान असेल,' असं त्याने स्पष्ट केलं होतं. सौरव गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 'या छोट्याशा कार्यकाळात प्रथम श्रेणी क्रिकेटपटूकडं माझं प्राधान्यानं लक्ष राहील,' असं त्यानं सांगितलं होतं.
BCCI: अध्यक्षपदासाठी पाठिंब्याच्या बदल्यात गांगुली करणार भाजपचा प्रचार?
कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुलीने भारत-पाक सामन्याबाबत सावध भूमिका व्यक्त केली. भारत-पाकिस्तान संघादरम्यान क्रिकेट सामने होणार की नाहीत, हे तुम्ही मोदी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय सामने सरकारच्या परवानगी शिवाय होत नाहीत. आमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये, असं सौरव गांगुलीने सांगितलं.
टीम इंडियाने २००४मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात पाकिस्तानात वनडे आणि टेस्ट मालिका जिंकली होती. त्यावेळी १९८९नंतर पहिल्यांदा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. कारगिल युद्धानंतर (१९९९) नंतर दोन्ही देशांदरम्यान पहिली द्विपक्षीय मालिका पार पडली होती.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयने आयसीसीने एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी दहशतवाद वाढवणाऱ्या देशांशी संबंध तोडण्याचे आवाहन क्रिकेट समुदायाला केली होती. या पत्रात बीसीसीआयने विश्वचषकासहित आयसीसीच्या भविष्यातील होणाऱ्या क्रिकेट सामन्या दरम्यान क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली होती. मात्र, पत्रानंतरही आयसीसीने पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर केलं नव्हतं. बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यानंतर हे पत्र लिहिलं होतं. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
सौरव बीसीसीआयचा संभाव्य अध्यक्ष
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत सौरव गांगुली याचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. सौरव गांगुली आजच अर्ज दाखल करणार आहे. अन्य कुणाचाही अर्ज दाखल होण्याची शक्यता नसल्यानं गांगुलीची निवड केवळ औपचारिकता उरली आहे. या पार्श्वभूमीवर त्यानं प्रतिक्रिया दिली होती. 'मी याआधी देशासाठी खेळलो आहे. भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळं साहजिकच क्रिकेटशी संबंधित देशातील सर्वोच्च संघटनेचं काम करण्याची संधी मिळणं हे आनंद देणारी गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षांत बीसीसीआयला अनेक प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे. मंडळाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. ती प्रतिमा बदलण्याची संधी मला मिळाली आहे. बिनविरोध निवड होणं ही मोठी जबाबदारी आहे. आर्थिकदृष्ट्या भारत हे क्रिकेटचं शक्तिकेंद्र असल्यानं माझ्यापुढं एक आव्हान असेल,' असं त्याने स्पष्ट केलं होतं. सौरव गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 'या छोट्याशा कार्यकाळात प्रथम श्रेणी क्रिकेटपटूकडं माझं प्राधान्यानं लक्ष राहील,' असं त्यानं सांगितलं होतं.
BCCI: अध्यक्षपदासाठी पाठिंब्याच्या बदल्यात गांगुली करणार भाजपचा प्रचार?