अ‍ॅपशहर

आली रे... मुंबई इंडियन्सचा संघ WPL च्या अंतिम फेरीत दाखल, युपीच्या संघाला चारली धुळ

WPL Final : मुंबई इंडियन्सच्या संघाने युपीच्या संघाला धुळ चारली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. नॅट स्विहरने तुफानी फलंदाजी केली व त्यामुळे संघाला १८२ धावसंख्या उभारता आली. त्यानंतर मुंबईच्या इसी वॉंगने हॅट्रीक घेत युपीचे कंबरडे मोडले आणि त्यांनी सहजपणे अंतिम फेरीत दिमाखात प्रवेशे केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 24 Mar 2023, 11:22 pm
नवी मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने आजच्या महत्वाच्या सामन्यात युपी वॉरियर्सला धुळ चारली आणि दिमाखात अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. नॅट स्विहरच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १८२ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या इसी वाँगने हॅट्रीक घेतली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेतील ही पहिली हॅट्रीक ठरली आहे. धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने युपीच्या संघाला ७२ धावांनी पराभूत केले आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत मुंबईला आता दिल्ली कॅपिटल्सशी सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai indians in wpl 2023 final
सौजन्य-बीसीसीआय


मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांना चांगली सुरुवात मिळाली. मुंबईच्या यास्तिका भाटीयाने यावेळी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. यास्तिकाने यावेळी १८ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर २१ धावा केल्या. पण यास्तिका बाद झाली आणि त्यानंतर मैदानात नॅट सिव्हर-ब्रंटचे वादळ घोघांवले. ब्रंटने यावेळी युपीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. कारण ब्रंट खेळायला आली आणि त्यानंतर मुंबईची धावगती ही चांगलीच वाढली. ब्रंटच्या फलंदाजीपुढे यावेळी युपीच्या गोलंदाजांना नतमस्तक व्हावे लागले. कारण ब्रंटने यावेळी चौफेर फटकेबाजी केली आणि मुंबईला मोठ्या धावसंख्येचे स्वप्न दाखवले आणि ते सत्यातही उतरवले. कारण ब्रंटने यावेळी ३८ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकांच्या जोरावर नाबाद ७२ धावांची वादळी खेळी साकारली. ब्रंटच्या या फलंदाजीच्या जोारावर मुंबईच्या संघाला २० षटकांत ४ बाद १८२ अशी मोठा धावसंख्या उभारता आली.

युपीचा संघ मुंबईच्या धावांचा पाठलाग करायला उतरला खरा, पण त्यांना सुरुवातीपासून चांगली लय सापडली नाही. ठराविक फरकाने त्यांनी आपले विकेट्स गमावले आणि त्यामुळे त्यांची अवस्था चांगली नव्हती. त्यामध्येच वाँगने हॅट्रीक साजरी केली आणि त्यांचे पुरते कंबरडे मोडले. या हॅट्रीकनंतर तर युपी हा सामना जिंकणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आणि त्यामुळेच मुंबई आता अंतिम फेरीत पोहोचणार हे त्यावेळीच समजले होते.

मुंबई इंडियन्यने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना अंतिम फेरीत पोहोचता आले आहे. आता मुंबईने जर एक सामना जिंकला तर त्यांना जेतेपद आपल्या नावावर करता येणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज