मुंबई : नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण क्रिकेटच्या मैदाना सिद्धू यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला धमकी दिली होती. पाकिस्तानच्या खेळाडूला सिद्धू यांनी तुझे हातच तोडून टाकेन, अशी धमी दिली आणि मैदानात मोठा वाद निर्माण झाला होता.
सिद्धू यांनी पाकिस्तानच्या खेळाडूना अशी धमकी का दिली होती, जाणून घ्या...
भारत आणि पाकिस्तान यांमध्ये १५ एप्रिल १९९६ या दिवशी संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामना सुरु होता. यावेळी भारताचा संघ फलंदाजी करत होता. सचिन तेंडुलकर आणि विक्रम राठोड हे सलामीला उतरले होते. त्यावेळी विक्रम हा फक्त दोन धावांवर बाद झाला होता. त्यावेळी भारताची १ बाद ९ अशी अवस्था होती. पण त्यानंतर सिद्धू आणि सचिन यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळे ३८ षटकांपर्यंत भारताला १ बाद १९३ अशी दमदार मजल मारता आली होती. सिद्धी त्यावेळी भन्नाट फॉर्मात होता. त्यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसने सिद्धूला अपशब्द वापरायला सुरुवात केली. वकार म्हणाला की, " ए सरदार, सरळ बॅटने खेळ ना, इथे-तिथे फटके कशाला मारता आहेत." यानंतर सिद्धू चांगलाच भडकला होता. सिद्धू वकारला म्हणाला की, " तुझं बोट तर यापूर्वीच तुटलेलं आहे. जर असचा वागत राहीलास तर तुझा हातच तोडून टाकेन." यानंतर वकार शांतच बसल्याचे पाहायला मिळाले.
सिद्धू यांनी शिक्षा का करण्यात आली आहे, पाहा...नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा का करण्यात आली, याचे कारणही आता समोर आले आहे. २७ डिसेंबर १९८८ ला पतियाळामध्ये पार्किंगवरून सिद्धू आणि एका ज्येष्ठ नागरिकामध्ये वाद झाला होता. यानंतर सिद्धूंनी त्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली आणि फरार झाले, असा आरोप आहे. पीडित ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घेषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात आता सिद्धू यांना अटक करण्यात आली आहे.
सिद्धू यांनी पाकिस्तानच्या खेळाडूना अशी धमकी का दिली होती, जाणून घ्या...
भारत आणि पाकिस्तान यांमध्ये १५ एप्रिल १९९६ या दिवशी संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामना सुरु होता. यावेळी भारताचा संघ फलंदाजी करत होता. सचिन तेंडुलकर आणि विक्रम राठोड हे सलामीला उतरले होते. त्यावेळी विक्रम हा फक्त दोन धावांवर बाद झाला होता. त्यावेळी भारताची १ बाद ९ अशी अवस्था होती. पण त्यानंतर सिद्धू आणि सचिन यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळे ३८ षटकांपर्यंत भारताला १ बाद १९३ अशी दमदार मजल मारता आली होती. सिद्धी त्यावेळी भन्नाट फॉर्मात होता. त्यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसने सिद्धूला अपशब्द वापरायला सुरुवात केली. वकार म्हणाला की, " ए सरदार, सरळ बॅटने खेळ ना, इथे-तिथे फटके कशाला मारता आहेत." यानंतर सिद्धू चांगलाच भडकला होता. सिद्धू वकारला म्हणाला की, " तुझं बोट तर यापूर्वीच तुटलेलं आहे. जर असचा वागत राहीलास तर तुझा हातच तोडून टाकेन." यानंतर वकार शांतच बसल्याचे पाहायला मिळाले.
सिद्धू यांनी शिक्षा का करण्यात आली आहे, पाहा...नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा का करण्यात आली, याचे कारणही आता समोर आले आहे. २७ डिसेंबर १९८८ ला पतियाळामध्ये पार्किंगवरून सिद्धू आणि एका ज्येष्ठ नागरिकामध्ये वाद झाला होता. यानंतर सिद्धूंनी त्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली आणि फरार झाले, असा आरोप आहे. पीडित ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घेषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात आता सिद्धू यांना अटक करण्यात आली आहे.