अ‍ॅपशहर

गर्वहरण... पहिल्या T 20 सामन्यात न्यूझीलंडपुढे भारताचे लोटांगण, सुंदरचे अर्धशतक ठरले निष्फळ

IND vs NZ : न्यूझीलंडने भारतापुढे विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने तीन विकेट्स लवकर गमावले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने चांगली भागीदारी रचली खरी, पण हे दोघे बाद झाले आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला, पण त्यानंतर सामन्यात नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 27 Jan 2023, 10:29 pm
रांची : आमच्या मातीत आम्हीच राजे... असा गर्व भारताच्या संघाला होता. पण गर्वाचे घर खाली असल्याचे पहिल्याच T 20 सामन्यात पाहायला मिळाले. भारताच्या संघावर पहिल्याच सामन्यातत न्यूझीलंडपुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. भारताच्या फलंदजांनी यावेळी निराशा केली आणि त्यामुळे भारताला न्यूझीलंडच्या या दौऱ्यातील पहिला पराभव पत्करावा लागला. वॉशिंग्टन सुंदरने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण तोपर्यंत हा सामना भारताच्या हातून निसटलेला होता. भारताला या सामन्यात २१ धावांनी पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India
सौजन्य-ट्विटर


न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ उतरला खरा, पण भारताला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. इशान किशनने एक चौकार लगावला खरा, पण त्यानंतर त्याला एकही धाव करता आली नाही आणि तो चार धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्याच षटकात भारताला दुसरा धक्का बसला. इशान बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी हा फलंदाजीसाठी आला होता. राहुल यावेळी सहा चेंडू खेळला खरा, पण त्याला भोपळाही फोडता आला नाही. जेकब टफीने त्याला शून्यावर बाद केले. भारताची २ बाद ११ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर चौथ्या षटकात भारताला अजून एक धक्का बसला. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने यावेळी भारताचा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले आणि भारताला तिसरा धक्का दिला. गिलला यावेळी ७ धावांवर समाधान मानावे लागले.

भारताची चौथ्या षटकात ३ बाद १५ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर हार्दिक आणि सूर्या हे खेळपट्टीवर होते. कर्णधार आणि उपकर्णधार आता भारताला विजय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. सूर्या हा धडाकेबाज फलंदाजी करत धावांची लूट करत होता. सूर्या ४७ धावांवर होता, त्यामुळे तो आता अर्धशतक झळकावेल असे वाटत होते. पण त्यावेळी एक मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्या बाद झाला आणि भारताला सर्वात मोठा धक्का बसला. सूर्याने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या. सूर्या बाद झाल्यावर पाचव्याच चेंडूवर हार्दिक पंड्याही बाद झाला आणि भारताला एकामागून एक दुसरा धक्का बसला. पंड्याला यावेळी २१ धावा करता आल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा यांच्यावर भारताचे भवितव्य होते. यावेळी सुंदरला १० धावांवर आणि हुडाला २ धावांवर असताना जीवदान मिळाले. त्यामुळे ही जोडी काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या जीवदानाचा फायदा हुडाला उचलता आला नाही आणि तो १० धावांवर बाद झाला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख