नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असं वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यानं सांगितलं. तसंच त्यानं कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा (४००) विक्रम मोडू शकणाऱ्या तीन फलंदाजांची नावंही सांगितली. यात दोन भारतीय फलंदाज आहेत.
ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. या संघात आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असं लारा म्हणाला. लाराच्या नावावर कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्यानं २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. हा विक्रम अद्याप कुणी मोडलेला नाही. मात्र, हा विक्रम मोडू शकणाऱ्या तीन फलंदाजांची नावं खुद्द लारानं सांगितली.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्डकप खेळणार आहे. अलीकडच्या काही वर्षांत भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात किंवा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, जेतेपद पटकावू शकला नाही. भारतानं धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
'या' धडाकेबाज फलंदाजावर एका वर्षाची बंदी
विराट आमच्यामुळंच इथपर्यंत पोहोचलाय: श्रीकांत
भारतीय संघात प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता
'आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकण्याची क्षमता सध्याच्या भारतीय संघात आहे. प्रत्येक संघ भारतीय संघालाच लक्ष्य करतो. त्याबद्दल विराट कोहली आणि त्यांच्या संघाचं कौतुक करायला हवं. भारतासोबत आपल्याला एक तरी महत्वाचा सामना खेळावा लागेल, याची कल्पना सगळ्याच संघांना आहे. मग उपउपांत्य फेरी, उपांत्य फेरी असो की अंतिम सामना!' असं लारा म्हणाला.
सर्वोच्च कसोटी धावांचा विक्रम कोण मोडणार?
कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च ४०० धावांचा विक्रम स्टीव्ह स्मिथ नाही, तर विराट कोहली, रोहित शर्मा किंवा डेव्हिड वॉर्नरसारखे फलंदाज मोडू शकतात, असं लारा म्हणाला. लारानं २००४ साली इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. हा विक्रम १५ वर्षांनंतरही कायम आहे. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. त्यामुळं त्याच्यासाठी हा विक्रम मोडणे कठीण आहे. तो महान खेळाडू आहे. मात्र, दबदबा कायम ठेवू शकत नाही. वॉर्नरसारखा खेळाडू निश्चितच हा विक्रम मोडू शकतो. विराट कोहलीसारखा खेळाडू, जो मैदानावर जाऊन लगेच जम बसवतो. तो खूपच आक्रमक खेळाडू आहे. तसंच रोहित शर्माही विक्रम मोडू शकतो. हे खेळाडू माझा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडू शकतात, असं तो म्हणाला.
हार्दिक पंड्याचा साखरपुडा, विराट म्हणाला...
दिव्यांग मुलाची 'धाव' पाहून सचिनचं मन हेलावलं!
ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. या संघात आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असं लारा म्हणाला. लाराच्या नावावर कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्यानं २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. हा विक्रम अद्याप कुणी मोडलेला नाही. मात्र, हा विक्रम मोडू शकणाऱ्या तीन फलंदाजांची नावं खुद्द लारानं सांगितली.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्डकप खेळणार आहे. अलीकडच्या काही वर्षांत भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात किंवा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, जेतेपद पटकावू शकला नाही. भारतानं धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
'या' धडाकेबाज फलंदाजावर एका वर्षाची बंदी
विराट आमच्यामुळंच इथपर्यंत पोहोचलाय: श्रीकांत
भारतीय संघात प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता
'आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकण्याची क्षमता सध्याच्या भारतीय संघात आहे. प्रत्येक संघ भारतीय संघालाच लक्ष्य करतो. त्याबद्दल विराट कोहली आणि त्यांच्या संघाचं कौतुक करायला हवं. भारतासोबत आपल्याला एक तरी महत्वाचा सामना खेळावा लागेल, याची कल्पना सगळ्याच संघांना आहे. मग उपउपांत्य फेरी, उपांत्य फेरी असो की अंतिम सामना!' असं लारा म्हणाला.
सर्वोच्च कसोटी धावांचा विक्रम कोण मोडणार?
कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च ४०० धावांचा विक्रम स्टीव्ह स्मिथ नाही, तर विराट कोहली, रोहित शर्मा किंवा डेव्हिड वॉर्नरसारखे फलंदाज मोडू शकतात, असं लारा म्हणाला. लारानं २००४ साली इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. हा विक्रम १५ वर्षांनंतरही कायम आहे. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. त्यामुळं त्याच्यासाठी हा विक्रम मोडणे कठीण आहे. तो महान खेळाडू आहे. मात्र, दबदबा कायम ठेवू शकत नाही. वॉर्नरसारखा खेळाडू निश्चितच हा विक्रम मोडू शकतो. विराट कोहलीसारखा खेळाडू, जो मैदानावर जाऊन लगेच जम बसवतो. तो खूपच आक्रमक खेळाडू आहे. तसंच रोहित शर्माही विक्रम मोडू शकतो. हे खेळाडू माझा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडू शकतात, असं तो म्हणाला.
हार्दिक पंड्याचा साखरपुडा, विराट म्हणाला...
दिव्यांग मुलाची 'धाव' पाहून सचिनचं मन हेलावलं!