दुबई : ढाका प्रीमियर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग अशा टी-२० लीगमध्ये खेळत असल्यामुळे आणि आगामी काळात अनेक स्पर्धांमध्ये खेळायचे असल्यामुळे सध्या कसोटीत यष्टीरक्षण करण्याचा विचार नाही, असे विधान बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकर रहीमने केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये यापुढे यष्टीरक्षण करण्यात आपल्याला रस नाही. पुढे अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत आणि मी सगळ्या क्रिकेट प्रकारात खेळतो. शिवाय, वेगवेगळ्या लीगमध्येही माझा सहभाग असतो. त्यामुळे माझ्यावर खूपच ओझे आहे, असे रहीमने म्हटले आहे.
रहीमने ६७ कसोटीत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून यष्टीरक्षक म्हणून त्याने १०३ झेल आणि १५ यष्टिचित केले आहेत.
रहीमने म्हटले आहे की, 'मला दीर्घकाळ क्रिकेट खेळायचे आहे. मी सर्व क्रिकेट प्रकारात खेळत असल्यामुळे मला गंभीरपणे विचार करावा लागेल. गेल्या पाच वर्षांत मला गंभीर स्वरूपाची अशी कोणतीही दुखापत झालेली नाही, त्याचवेळी मी पुरेशी विश्रांतीही घेतलेली नाही. एखाद-दुसरी मालिका खेळलो नाही तर माझ्यावरील हे ओझे कमी होणारे नाही. त्यामुळे कसोटीत यष्टीरक्षण करायचे नाही, हा माझ्यासमोर उपाय आहे.'
रहीम म्हणतो की, 'यष्टीरक्षण करत असताना माझी कामगिरी खराब होते असे काही नाही. उलट कसोटीतील दोन द्विशतके मी यष्टीरक्षण करत असतानाच ठोकलेली आहेत. शिवाय, यष्टीरक्षण करत असताना मला यष्टीपाठी उभे राहून साऱ्या परिस्थितीचे नीट आकलनही होते. त्यामुळे फलंदाजीला फायदाच होतो. मात्र आता मी वयाची तिशी ओलांडली आहे. म्हणून दीर्घकाळ क्रिकेट खेळण्यासाठी मी यष्टीरक्षणाला रामराम करू इच्छितो.'
बांगलादेशची आता भारताशी तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांत झुंज होणार आहे. ३ नोव्हेंबरपासून टी-२० मालिकेला नवी दिल्लीतील लढतीने प्रारंभ होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये यापुढे यष्टीरक्षण करण्यात आपल्याला रस नाही. पुढे अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत आणि मी सगळ्या क्रिकेट प्रकारात खेळतो. शिवाय, वेगवेगळ्या लीगमध्येही माझा सहभाग असतो. त्यामुळे माझ्यावर खूपच ओझे आहे, असे रहीमने म्हटले आहे.
रहीमने ६७ कसोटीत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून यष्टीरक्षक म्हणून त्याने १०३ झेल आणि १५ यष्टिचित केले आहेत.
रहीमने म्हटले आहे की, 'मला दीर्घकाळ क्रिकेट खेळायचे आहे. मी सर्व क्रिकेट प्रकारात खेळत असल्यामुळे मला गंभीरपणे विचार करावा लागेल. गेल्या पाच वर्षांत मला गंभीर स्वरूपाची अशी कोणतीही दुखापत झालेली नाही, त्याचवेळी मी पुरेशी विश्रांतीही घेतलेली नाही. एखाद-दुसरी मालिका खेळलो नाही तर माझ्यावरील हे ओझे कमी होणारे नाही. त्यामुळे कसोटीत यष्टीरक्षण करायचे नाही, हा माझ्यासमोर उपाय आहे.'
रहीम म्हणतो की, 'यष्टीरक्षण करत असताना माझी कामगिरी खराब होते असे काही नाही. उलट कसोटीतील दोन द्विशतके मी यष्टीरक्षण करत असतानाच ठोकलेली आहेत. शिवाय, यष्टीरक्षण करत असताना मला यष्टीपाठी उभे राहून साऱ्या परिस्थितीचे नीट आकलनही होते. त्यामुळे फलंदाजीला फायदाच होतो. मात्र आता मी वयाची तिशी ओलांडली आहे. म्हणून दीर्घकाळ क्रिकेट खेळण्यासाठी मी यष्टीरक्षणाला रामराम करू इच्छितो.'
बांगलादेशची आता भारताशी तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांत झुंज होणार आहे. ३ नोव्हेंबरपासून टी-२० मालिकेला नवी दिल्लीतील लढतीने प्रारंभ होईल.