अ‍ॅपशहर

Why Team India Lost: भारताने जिंकणारा सामना कोणत्या एका मोठ्या चुकीमुळे गमावला, पराभवाचे एकमेव कारण जाणून घ्या

Why Team India Lost to England: भारतीय संघ हा सामना जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. कारण भारताने तब्बल ३७८ धावांचे आव्हान इंग्लंडपुढे ठेवले होते. पण त्यावेळी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचाच फटका भारताच्या संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने तीन विकेट्स मिळवल्यावर कर्णधार बुमराकडून कोणती चूक घडली होती, जाणून घ्या..

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Jul 2022, 11:24 am
बर्मिंगहम : भारतीय संघ हा सामना जिंकत ऐतिहासिक विजय साकारेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण हा सामना भारताने गमावला. भारताने हा जिंकणारा सामना कसा गमावला, याचे एकमेव मोठे कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Why Team India Lost to England

भारताने कोणत्या एकमेव गोष्टीमुळे सामना गमावला, जाणून घ्या...
भारताने इंग्लंडपुढे ३७८ धावांचे दमदार आव्हान ठेवले होते. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पण त्यानंतरही भभारताच्या संघाने या सामन्यात दमदार पुनरागमन केले होते. भारताने या सामन्यात एकदा जोरदार पुनरागमन केले होते. कारण एकेकाळी इंग्लंडची बिनबाद १०६ अशी अवस्था होती. त्यानंतर १०७ धावांवर इंग्लंडचा पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर फक्त दोन धावांत भारताने इंग्लंडला अजून दोन धक्के दिले होते आणि त्यांची ३ बाद १०९ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यावेळी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचाच फटका यावेळी भारताला बसला. बुमराने त्यावेळी जे क्षेत्ररक्षण लावले होते ते बचावात्मक होते. कारण त्यावेळी आक्रमक क्षेत्ररक्षण लावणे गरजेचे होते. कारण त्या एकमेव गोष्टीमुळेच भारताला विकेट्स मिळवता आल्या असत्या. पण बुमरा हा नवीन कर्णधार असल्यामुळे त्याला ही गोष्ट जमली नाही आणि भारताच्या हातून विजय निसटल्याचे पाहायला मिळाले.

भारताच्या हातून यावेळी सामना हिरावून घेतला तो जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी. भारताच्या गोलंदाजांनी सामना जिंकण्यासाठी काही काळ शर्थीचे प्रयत्न केले, पण हे सर्व प्रयत्न रुट आणि बेअरस्टो यांनी यशस्वी होऊ दिले नाहीत. रुट आणि बेअरस्टो यांनी पाचव्या दिवशी तर भारताच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला आणि इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेअरस्टोने तर पहिल्या डावातही शतक झळकावले होते. दुसऱ्या डावातही त्याने पुन्हा शतक झळकावले. पण दुसऱ्या डावात बेअरस्टोपेक्षा जो रुट हा आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय साकारता आला नाही.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज