अ‍ॅपशहर

विराटला कसलीही हमी वारंवार देण्याची गरज नाही; रोहित शर्माने ठणकावले!

Rohit Sharma on Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल गेल्या काही दिवसापासून फार चर्चा सुरू आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील यावर बोलला आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2022, 10:45 am
लंडन: ‘कामगिरीत चढउतार होत असतात. हे प्रत्येक खेळाडूबाबतच होते. मात्र, महान खेळाडूचा दर्जा कधीही कमी होत नसतो. विराट कोहली हा महान फलंदाज आहे. त्याच्या संघातील स्थानाबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही,’ असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma Virat Kohli
रोहित शर्मा, विराट कोहली


इंग्लंडविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला शंभर धावांनी एकतर्फी हार स्वीकारावी लागली. या सामन्यात कोहली १६ धावांवरच बाद झाला. त्यामुळे कोहलीच्या संघातील स्थानाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. लढत संपल्यानंतर कोहलीच्या फॉर्मबाबतचा प्रश्नही रोहितने पूर्ण होऊ दिला नाही. ‘कोहलीबाबत एवढी चर्चा का होते हेच मला कळत नाही. तो दीर्घ कालावधीपासून खेळत आहे. तो महान फलंदाज आहे. त्याला कसलीही हमी आम्ही वारंवार देण्याची गरज नाही,’ असे रोहित म्हणाला.

वाचा-सचिन तेंडुलकरचे लंडनमधील आलिशान घर; बाल्कनीतून थेट दिसते...

कोहलीला वगळले का जात नाही, अशी विचारणा आता माजी क्रिकेटपटू करीत आहेत. मात्र, रोहितने कोहलीचे संघातील स्थान भक्कम असल्याचे सांगितले. भारताला अनेक सामने जिंकून दिलेल्या खेळाडूला पुन्हा जोशात येण्यासाठी एखादी खेळी पुरेशी असते, असेही रोहित म्हणाला. ‘कोहलीबाबत खूपच चर्चा होत आहे, हे मी जाणतो; पण जो खेळाडू दीर्घ कालावधीपासून खेळत आहे. त्याची कामगिरी बघा, त्याने किती शतके केली आहेत, ते बघा. त्याची सरासरी, त्याचा अनुभव खूप काही सांगतो. आपल्या वैयक्तिक जीवनातही काही वेळा अपयश येते,’ असे रोहितने नमूद केले.

वाचा-ड्रग्स, धोकादायक शस्त्रांनी हल्ला, तुरुंगवास आणि बरच काही; ललित मोदीबद्दल या गोष्टी तुम्ही..

खेळात बदल होत आहेत. फलंदाजीत बदल होत आहे. त्यामुळे आम्हालाही बदलावे लागेल. त्यासाठी मानसिकताही बदलावी लागेल. अधिक सकारात्मक खेळ करावा लागेल. धावांचा पाठलाग करताना काय वेगळे करता येईल, याचाही विचार करावा लागेल. हे शक्य झाल्यास संघाचा आत्मविश्वास उंचावण्यासही मदत होते.
- रोहित शर्मा, भारताचा कर्णधार

वाचा- आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा शक्तिशाली संघ, किमान २० पदकांची अपेक्षा

दृष्टिक्षेप...

- कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेत दुखापतीमुळे खेळला नव्हता.

- दुसऱ्या वन-डेत कोहली २५ चेंडूंत तीन चौकारांसह १६ धावांवर बाद

- इंग्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांत तो १ आणि ११ धावांवरच माघारी

- इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत ११ आणि २० धावाच.

- आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये कोहलीला स्थान देऊ नये, अशीही चर्चा सुरू

- कोहलीला स्थान देण्यासाठी दीपक हुडाला टी-२० संघातून वगळण्यात आल्याने आजी-माजी खेळाडूंची नाराजी

कोहली हाही माणूसच आहे. त्यामुळे त्यालाही अपयशास सामोरे जावे लागत आहे. त्याची कायम सर्वोत्तम खेळाडूत गणना होईल. तो जबरदस्त खेळाडू आहे. सर्वच महान फलंदाजांच्या बॅटमधून काही वेळा धावा होत नाहीत. प्रतिस्पर्धी कर्णधार म्हणून सांगतो, त्याच्यासारखा फलंदाज कधीही मोठी खेळी करू शकेल, याची आम्हाला पूर्ण कल्पना असते.
- जोस बटलर, इंग्लंडचा कर्णधार
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख