अ‍ॅपशहर

बीसीसीआयचा मोठा निर्णय, ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी खास व्यक्तीची भारतीय संघात निवड

T- 20 World Cup : भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे २०११ साली भारतीय संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका व्यक्तीची निवड आता बीसीसीआयने भारतीय संघासाठी केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघात आता कोणाची निवड केली आहे, जाणून घ्या.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 27 Jul 2022, 12:01 pm
मुंबई : बीसीसीआयने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी जोरदार पावलं उचलत असल्याचे आता समोर आले आहे. त्यासाठी भारतीय संघाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी एका खास व्यक्तीची निवड केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paddy upton
सौजन्य-बीसीसीआय


भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे २०११ साली भारतीय संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका व्यक्तीची निवड आता बीसीसीआयने भारतीय संघासाठी केली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून बीसीसीआयने बऱ्याच कालावधीनंतर या खास व्यक्तीला भारतीय संघात स्थान दिले आहे.

बीसीसीआयने ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघात पॅडी अप्टन यांनी मानसिक कंडिशनिंग तज्ज्ञ म्हणून निवड केली आहे. काहीवेळा खेळाडूंचे मानसीक खच्चीकरण होते किंवा काही खेळाडू निराश होतात आणि त्याचा त्यांच्या कामगिरीवर परीणाम होत असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूला मानसीकदृष्ट्या तंदुरुस्त करण्यासाठी अप्टन यांची निवड बीसीसीआयने केली आहे.

वाचा-तिसरा वनडे सामना किती वाजता आणि कुठे Live पाहता येणार, जाणून घ्या वेळ आणि चॅनेल...

बीसीसीआयमधील सूत्रांनी यावेळी सांगितले की," संघ व्यवस्थापनाला वाटले की पॅडीचा अनुभव खेळाडूंना मदत करेल आणि म्हणूनच बीसीसीआयने त्याची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अप्टन यांनी भारतीय संघाबरोबर कामही केले आहे आणि त्याचा चांगला अनुभव भारतीय खेळाडूंना आला आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून त्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांतच अप्टन हे भारतीय संघामध्ये एंट्री घेणार आहेत."

वाचा-तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघात होऊ शकतात दोन मोठे बदल, जाणून घ्या कोणाला मिळेल संधी...

भारताने २०१३नंतर एकही आयसीसीची स्पर्धा जिंकेलली नाही. त्यामुळे द्रविड यांनी संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्यावर भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल होत असून विश्वचषकासाठी संघाची बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळेच द्रविड यांनी येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी पर्याय शोधलेला आहे. कर्णधारासाठीही त्यांनी बरेच पर्याय शोधलेले आहेत. त्याचबरोबर आता संघात अप्टन यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. अप्टन हे वेस्ट इंडिजबरोबरच्या ट्वेन्टी-२० मालिकेपासून भारतीय संघाबरोबर असतील, हे आता बीसीसीआने स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख