अ‍ॅपशहर

पहिल्या कसोटीच्या पिचवरून पाकिस्तानची इज्जत गेली; ICCकडून बसणार दणका

PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १ हजारहून अधिक धावसंख्या उभी झाली. पण फक्त १४ विकेट पडल्या.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2022, 12:33 pm
नवी दिल्ली: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथे झालेली पहिली कसोटी ड्रॉ झाली. या सामन्यात धावांचा डोंगर उभा राहिला पण गोलंदाजांची अवस्था खराब झाली. सामना झाल्यानंतर दिग्गज खेळाडूंपासून ते चाहत्यांनी रावळपिंडी येथील पिच संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रावळपिंडी पिच


वाचा- New Laws Of Cricket: क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल; फलंदाजाला आता अशा पद्धतीने बाद...

पहिल्या कसोटीत दोन्ही संघांनी १ हजार १८७ धावा केल्या आणि फक्त १४ विकेट पडल्या. याचा अर्थ खेळपट्टी फक्त फलंदाजांचा विचार करून तयार करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्सने सांगितले की अशा प्रकारच्या मृत विकेटच्या बाबतचा निर्णय मी चाहते आणि समालोचकांवर सोडून देतो. प्रत्येक जण बॅट आणि बॉल यांच्यातील स्पर्धा पाहू इच्छितो. मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी देखील तेच चांगले आहे.

वाचा- IPL सुरू होण्याआधी लखनौला बसला मोठा झटका; या स्टार खेळाडू शिवाय कसा खेळणार संघ

सामना जेव्हा ड्रॉ झाला तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमवता २५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने पहिल्या डावात ४ बाद ४७६ तर ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा केल्या होत्या. हा सामना झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या पिचला काय रेटिंग गुण देते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे पिच खराब होते हे वृत्त फेटाळून लावले.

वाचा- शेन वॉर्न एकाच वेळी दोन महिलांकडून घेत होता मसाज; निधनाच्या आधीचे CCTV फुटेज

ऑस्ट्रेलियाचा संघ १९९८ नंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळत आहे. याआधी सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. दोन्ही संघात दुसरी कसोटी १२ मार्चपासून होणार आहे. पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीफ यांनी शतक झळकावली. हकने पहिल्या डावात १५७ आणि दुसऱ्या डावात नाबाद १११ धावा केल्या. तर शफीफने १३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे हे पाकिस्तानचे पहिले सलामीवीर ठरले आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख