अ‍ॅपशहर

आठ वर्षानंतर भारताविरुद्ध पाकिस्तान जिंकला; रोहितचे कुठे चुकले; या ३ गोष्टींमुळे झाला पराभव

Asia Cup: दुबईत झालेल्या आशिया कप सुपर-४ मधील सामन्यात पाकिस्तानने भारताचा ५ विकेटनी पराभव केला. भारताने दिलेले १८२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९.५ षटकार पार केले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2022, 12:16 am
दुबई: आशिया कपमध्ये रविवारी झालेल्या सुपर-४ च्या लढतीत पाकिस्तानने भारताचा ५ विकेटनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १८१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने ५ विकेट आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. आशिया कप स्पर्धेत ८ वर्षानंतर भारताचा पाकिस्तानने पराभव केलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma


टॉस गमावल्यानंतर भारताने फलंदाजीत चांगली सुरूवात केली होती. मात्र टीम इंडियाला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात रोहित शर्माने ३ बदल केले होते. दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाचा संघात समावेश करण्यात आला होता. त्याच बरोबर रवी बिश्नोई आणि हार्दिक पंड्या ज्याला गेल्या सामन्यात विश्रांती दिली होती तो देखील संघात परतला होता.

वाचा- कोण आहे रयाल बर्ल? फक्त १८ चेंडूत जगजेत्या ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला

कुठे चुकले?

१) फलंदाजीत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. या जोडीने अर्धशतकी भागिदारी केल्यानंतर मात्र भारताच्या मधळ्या फळीतील फलंदाजांना चांगली धावसंख्या करता आली नाही. विराट कोहलीने अर्धशतक केले. पण त्याला कोणाची साथ मिळाली नाही. सूर्यकुमार यादव (१३ धावा), दीपक हुड्डा (१६), ऋषभ पंत (१४) धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताला २०० धावसंख्येपर्यंत पोहोचता आले नाही.

वाचा- भारत-पाकिस्तान मॅच: रवी शास्त्री फुल जोशात, रोहित शर्माला हसू आवरता आले नाही, Video

२) पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या या सामन्यातील पराभवाचा व्हिलन ठरला. आज हार्दिक शून्यावर बाद झाला. त्यानंतर गोलंदाजीत त्याने ४ ओव्हरमध्ये ४४ धावा दिल्या.

वाचा- रोहितच्या फक्त २ षटकारने झाले मोठे विक्रम; एकाच वेळी दोघा दिग्गजांना मागे टाकले

३) भारताचा मुख्य जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४० धावा दिल्या. पाकिस्तानला अखेरच्या १२ चेंडूत २६ धावांची गरज होती. भारताकडून १९वे षटक भुवीने टाकले. त्याच्या या ओव्हरमध्ये पाकिस्तानने १९ धावा वसुल केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी फक्त ७ धावांची गरज होती.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज