अ‍ॅपशहर

करोना रुग्णांपुढे पाक डॉक्टरांनी केला डान्स

सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून पाकिस्तानमधील डॉक्टरही करोनाबाबत गंभीर नसल्याचेच दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2020, 7:18 pm
करोना व्हायरसबाबत पाकिस्तानमध्ये गंभीरतेचे वातावरण नाही, असेच सध्या पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानचे क्रिकेटपटू करोना व्हायरसच्या काळात काहीही बोलताना दिसत आहेत, त्याचबरोबर आता त्यांचे डॉक्टरही गंभीरपणे काम करताना दिसत नाहीत. कारण सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistani doctors dance in front of corona virus patients
करोना रुग्णांपुढे पाक डॉक्टरांनी केला डान्स



भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा विद्यचमान खासदार गौतम गंभीरने एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे थेट हॉस्पिटलमध्येच डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याटमुळे या डॉक्टरांवर आता जगभरातून टीकेची झोड उठत आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलदाज शोएब अख्तरने भारताने आम्हाला १० हजार वेंटिलेटर्स द्यावेत, अशी मागणी केली होती. त्याच्या या मागणीवरून पाकिस्तानमध्ये नेमकी काय अव्था असेल, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. पण पाकि्तानमध्ये एवढी भीषण अवस्था असतानाही त्यांच्या डॉक्टरांना करोना व्हायरसविषयी गांभीर्य नाही, हे धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

आफ्रिदी म्हणतोय, मोदी सरकार नकारात्मक...
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मोदी सरकार हे नकारात्मक आहे, असे खळबळजनक वक्तव्य आफ्रिदीने केले आहे.

नेमके घडले तरी काय
करोनाशी लढण्याठी जो मदतनिधी लागेल तो आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून जमा करू शकतो, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. यानंतर शोएबवर भारतातून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर शोएबने मात्र हा विषय काढला नाही. पण आता मात्र आफ्रिदीने या विषयाला हात घातला आहे. "भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा एक दुवा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवाया हवे," असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज