अ‍ॅपशहर

चौथ्या सामन्यासाठी पीच ठरणार किंगमेकर, दोन खेळपट्ट्या तयार, पाहा कोणाला लॉटरी लागणार

IND vs AUS : निर्णायक चौथ्या कसोटीसाठी पुन्हा एकदा पीच किंगमेकर ठरणार आहे. कारण या मॅचसाठी दोन खेळपट्ट्या बनवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी नेमके कोणते पीच वापरणार, हे आता सर्वात महत्वाचे ठरेल. त्यामुळे आता या चौथ्या कसोटीसाठी पीचची लॉटरी कोणाला लागेल, याकडे सर्वांचे लक्ष आता लागलेले पाहायला मिळत आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 8 Mar 2023, 5:01 pm
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी चौथा कसोटी सामना हा निर्णायक असेल. पण या सामन्यासाठी मात्र पीच पुन्हा एकदा किंगमेकर ठरणार असल्याचे समोर आले आहे. कारण एका सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणती खेळपट्टी या सामन्यासाठी वापरणार आणि कोणत्या संघाला लॉटली लागणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs AUS
सौजन्य-बीसीसीआय


गुजरात क्रिकेट संघटनेनुसार सध्याच्या घडीला दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहे. यामध्ये पहिले पीच हे लाल मातीचे असेल, तर दुसरे काळ्या मातीचे बनवलेले आहे. जर लाल मातीचे पीच या सामन्यासाठी वापरले तर फिरकी गोलंदाजांचा चांगली मदत मिळू शकते, दुसरीकडे जर काळ्या मातीचे पीच वापरले तर फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना चांगली मदत मिळू शकते. ही खेळपट्टी वेगवान गोलंजांना चांगली मदत करू शकते. पण येत्या २४ तासांत या खेळपट्टीवर पाणी किती टाकले जाते, हे देखील महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी कोणते पीच या मॅचसाठी वापरण्यात येणार, हे अजून ठरलेले नाही. पण भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी लाल मातीचे पीच वापरले जाईल. त्यामुळे जर लाल मातीचे पीच वापरले तर भारतासाठी ती लॉटरी ठरू शकते. दुसरीकडे जर काळ्या मातीचे पीच वापरले गेले तर ऑस्ट्रेलियाला या मालिकेत सर्वाधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला लॉटरी लागू शकते. त्यामुळे आता या चौथ्या सामन्यात पीच हे पुन्हहा एकदा किंगमेकर ठरू शकते.

भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल. कारण त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा असेल. त्याचबरोबर भारताने हा सामना जिंकता तर त्यांना मालिका विजय मिळवता येऊ शकतो. पण जर त्यांना हा सामना गमवावा लागला तर ही मालिका जिंकता येणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया विजयासह या मालिकेत बरोबरी करू शकते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख