अ‍ॅपशहर

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर एक....; पाहा शेन वॉर्न काय म्हणाला

समकालीन क्रिकेटपटू असलेले द्रविड आणि वॉर्न यांच्यात मैदानावर चांगलीच टक्कर असायची. नंतर दोघांनीही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी एकत्र काम केले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 28 Jan 2022, 9:20 am
मुंबई : राहुल द्रविड भारतीय संघाला बळ देईल, पण त्याची मुख्य भूमिका पारंपरिक प्रशिक्षकाची नसून 'मॅन मॅनेजर'ची असेल, असे ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने म्हटले आहे. 'राहुल द्रविड संघात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करेल. तो एक अप्रतिम क्रिकेटर आणि खूप चांगला माणूस आहे. तो संघ मजबूत करेल. मला वाटते की, तो संघात बरीच धोरणात्मक कौशल्ये जोडेल, जी चांगली गोष्ट आहे. राहुल भारतीय क्रिकेटसाठी खरंच अप्रतिम गोष्ट आहे,'' असे मला वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul dravid is chief manager not coach of team india says shane warne
राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर एक....; पाहा शेन वॉर्न काय म्हणाला


वाचा- असा पराभव कोणाचा होऊ नये; पाहा अखेरच्या षटकात काय झाले

प्रशिक्षक नाही व्यवस्थापक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील द्रविडच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे कसा पाहतो, यावरही वॉर्न बोलला. तो म्हणाला, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षक हा शब्द मला आवडत नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रशिक्षक हे खरेच महत्त्वाचे असतात, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना प्रशिक्षक नव्हे, तर व्यवस्थापक म्हणायला हवे.

वाचा- BCCIचे डोळे उघडले; दक्षिण आफ्रिका दौऱ्यात असे काय घडले ज्यामुळे...

कमकुवत कर्णधारांचा परिणाम
एक काळ असा होता की, ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नसारखे, तर भारताकडे अनिल कुंबळे आणि पाकिस्तानकडे मुश्ताक अहमदसारखे जागतिक दर्जाचे लेग स्पिनर होते, पण गेल्या दीड दशकात मनगटाच्या बळावर फिरकी टाकणाऱ्या गोलंदाजांची भूमिका कमी झाली. दरम्यानच्या काळात फक्त पाकिस्तानच्या यासिर शाहने आपली छाप सोडली. कमकुवत कर्णधारांमुळेच जास्त लेग-स्पिनर कसोटी स्तरावर येत नाहीत, हे वॉर्नने कबूल केले.

वॉर्न पुढे म्हणाला, “तुम्हाला फिरकी गोलंदाजीचे महत्त्व समजणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. लेगस्पिन गोलंदाजी करणे सोपे नाही. हे एक कठीण कौशल्य आहे. ही एक अशी कला आहे, ज्याला कर्णधार आणि प्रशिक्षक तसेच खेळात सहभागी असलेल्या प्रत्येकाकडून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. लेगस्पिन गोलंदाजांसाठी क्षेत्ररक्षण लावणे महत्त्वाचे आहे की, मी ते व्यक्तही करू शकत नाही आणि अनेक कर्णधारांना याबाबत गैरसमज आहे.

वाचा- तो फोन जवळ ठेवत नाही आणि माझ्याकडे त्याचा नंबर देखील नाही, भारतीय खेळाडूबद्दल झाला मोठा...

सध्याच्या पिढीतील फलंदाजांना चांगल्या फिरकी गोलंदाजीचा सामना करावा लागत नाही, असेही वॉर्नचे मत आहे. तो म्हणाला, “सध्याच्या खेळाकडे पाहिल्यास, वेगवान गोलंदाजांनंतर फलंदाजांना अनेक फिरकीपटूंचा सामना करावा लागत आहे आणि ते त्यांच्यावर सहज मात करू शकतात, पण नव्वदच्या दशकातील फलंदाजांच्या बाबतीत असे नव्हते.” वॉर्नने आपल्याकडून काही चुका झाल्याची कबुली दिली, पण मानसिकदृष्ट्या खंबीर असल्याने त्याने त्याच्यावर मात केली.

वाचा- क्रिकेट न खेळता रोहित शर्माचा जलवा कायम; तर विराट झाला

कठीण काळाचा सामना करा
तो म्हणाला की, 'जर सर्व काही ठीक चालले असेल, तर जीवनात पुढे जाणे सोपे होते, पण कठीण प्रसंगावर मात कशी करायची, हे खूप महत्त्वाचे आहे. मला खूप अभिमान आहे की, मी कठीण प्रसंगांना तोंड दिले, मग ते कसोटी सामने असो किंवा वैयक्तिक आयुष्य. मानसिकरित्या मजबूत असल्याने मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकलो.'

महत्वाचे लेख