मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावर शतकानुशतके सुरू असलेले द्वंद्व कोणापासून लपलेले नाही. अशा परिस्थितीत सध्याचे दोन मोठे स्टार खेळाडू विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना केली जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही संघासाठी अनेक मॅचविनिंग इनिंग खेळल्या आहेत. तो दीर्घकाळापासून टी-२० क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. परंतु या सर्व कामगिरीनंतरही बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अलीकडच्या काळात त्यांच्या स्ट्राइक रेटमुळे मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे आणि टी-२० क्रिकेटमधील पाकिस्तानच्या संघर्षासाठी त्यांना जबाबदार धरले जात आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी टीकाकारांना शांत करण्यासाठी विराट कोहलीचे उदाहरण दिले आहे. एका पाकिस्तानी टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रमीझ राजाने यांनी सांगितले की, आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध आमच्या संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती. त्यामुळे संघावर जोरदार टीका होत आहे.
रोहितसह सर्व स्टार खेळाडू देशाबाहेर; द.आफ्रिकेचा पराभव करण्याची जबाबदारी दिली या स्फोटक खेळाडूवर!
आपला मुद्दा स्पष्ट करताना पाकिस्तानचे माजी कर्णधार म्हणाले की, विराट कोहलीने आशिया चषकात शतक झळकावले तेव्हा भारताचे चाहते आणि प्रसार माध्यमांना भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यात आलेले अपयश आणि स्पर्धेतील खराब कामगिरीचा विसर पडला. भारतीय संघ तर जेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार होता. तो म्हणाला की, बाबर आझमने शतक झळकावल्यावर पाकिस्तानी चाहते आणि मीडियाने हे अजिबात केले नाही. शतकाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
"म्हणूनच आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण अंतिम फेरीत पोहोचलो पण तिथे चांगली कामगिरी करू शकलो नाही; कारण तो दिवस खराब होता, आता आपण ते विसरून पुढे जायला हवे. बाकीच्या संघांकडे बघा, विशेषत: भारत टूर्नामेंटचा फेव्हरेट असूनही पराभूत होत आधीच बाहेर पडला होता, विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि आशिया चषकातील त्याची कामगिरी सर्वजण विसरले." असे रमीझ राजा म्हणाले.
विश्वचषकापूर्वीच्या भारताचे सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, मिशन मेलबर्नमधला पहिला
नुकत्याच इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ७ टी-२० सामन्यांच्या घरच्या मालिकेत पाकिस्तानला ४-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या स्ट्राईक रेटमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे.
रोहितसह सर्व स्टार खेळाडू देशाबाहेर; द.आफ्रिकेचा पराभव करण्याची जबाबदारी दिली या स्फोटक खेळाडूवर!
आपला मुद्दा स्पष्ट करताना पाकिस्तानचे माजी कर्णधार म्हणाले की, विराट कोहलीने आशिया चषकात शतक झळकावले तेव्हा भारताचे चाहते आणि प्रसार माध्यमांना भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यात आलेले अपयश आणि स्पर्धेतील खराब कामगिरीचा विसर पडला. भारतीय संघ तर जेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार होता. तो म्हणाला की, बाबर आझमने शतक झळकावल्यावर पाकिस्तानी चाहते आणि मीडियाने हे अजिबात केले नाही. शतकाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
"म्हणूनच आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण अंतिम फेरीत पोहोचलो पण तिथे चांगली कामगिरी करू शकलो नाही; कारण तो दिवस खराब होता, आता आपण ते विसरून पुढे जायला हवे. बाकीच्या संघांकडे बघा, विशेषत: भारत टूर्नामेंटचा फेव्हरेट असूनही पराभूत होत आधीच बाहेर पडला होता, विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि आशिया चषकातील त्याची कामगिरी सर्वजण विसरले." असे रमीझ राजा म्हणाले.
विश्वचषकापूर्वीच्या भारताचे सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, मिशन मेलबर्नमधला पहिला
नुकत्याच इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ७ टी-२० सामन्यांच्या घरच्या मालिकेत पाकिस्तानला ४-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या स्ट्राईक रेटमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे.