अ‍ॅपशहर

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर शास्त्रींनी तोडलं मौन

INDvsENG : टी-२० विश्वचषक २०२१नंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांना आणखी एक संधी मिळेल की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. विराट आणि रोहित याबद्दल पाहा काय म्हणालेत शास्त्री...

Lipi 2 Sep 2021, 12:23 pm
ओव्हल : २०१९ च्या विश्वचषकावेळी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यात झालेल्या वादावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट आणि रोहित या दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांच्यात कोणताही वाद झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi shastri breaks silence on rift between virat kohli and rohit sharma
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर शास्त्रींनी तोडलं मौन


वाचा- इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथी कसोटी कधी, कुठे पाहाल

टाइम्स नाऊशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. जर काही समस्या असेल, तर त्यांनी स्वत: त्यावर चर्चा केली असती आणि दुरावा दूर केला असता. त्यांच्यात वाद झाल्याचे मी कधीच पाहिले नाही. जेव्हा जेव्हा कोणी मला हा प्रश्न विचारतो, तेव्हा मी म्हणतो की, तुम्ही असं काय पाहिलं आहे, जे मी पाहिलं नाही. दोघांमधील समन्वय चांगला आहे. त्याचा संघावर होणारा परिणाम मी कधीच पाहिला नाही. जर संघावर काही परिणाम झाला असता, तर मी स्वत: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तसे सांगितले असते, पण असे काही घडले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या वादाच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहेत, पण दोन्ही खेळाडूंनी याबद्दल काहीच सांगितलं नाही.

वाचा- चौथ्या कसोटीच्या २४ तास आधी हिटमॅन रोहितने दिला विराटला धक्का; तर...

ओव्हल कसोटीपूर्वी शास्त्रींचा भारतीय खेळाडूंना महत्त्वाचा संदेश

दरम्यान, रवी शास्त्रींनी ओव्हल कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना महत्त्वाचा संदेश दिला आहे. खेळाडूंनी लॉर्ड्स कसोटी सामन्यातील विजय लक्षात ठेवला पाहिजे आणि मागील सामन्यातील पराभव विसरला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने टाइम्स नाऊशी झालेल्या संभाषणावेळी ते म्हणाले की, आता भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभव विसरून फक्त लॉर्ड्स कसोटी सामन्यात विजय लक्षात ठेवावा. बोलणं आणि करणं यात मोठा फरक आहे, हे मला माहित आहे, पण आपण आपल्या चांगल्या गोष्टींबद्दल देखील लक्षात ठेवले पाहिजे. खेळामध्ये अशा गोष्टी घडत असतात.

वाचा- तालिबानने क्रिकेट संदर्भात घेतला मोठा निर्णय; अफगाणिस्तान संघावर...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज