अ‍ॅपशहर

धोनीच्या कोणत्या एका वाक्यामुळे रवींद्र जडेजाकडून चेन्नईचे कर्णधारपद काढण्यात आले, वाचा सत्य...

Chennai Super Kings: आयपीएलचा २०२२ सालचा हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यावेळी धोनीने संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर जडेजाने या मोसमात ८ सामन्यात चेन्नईच्या संघाचे नेतृत्व केले, परंतु जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला केवळ २ सामने जिंकता आले होते. पण धोनीने त्यानंतर नेमकं काय केलं, पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 16 Aug 2022, 11:14 am
नवी दिल्ली : आयपीएल सुरु असतानाच रवींद्र जडेजाकडून चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, हे समोर आलं नव्हतं. पण आता मात्र महेंद्रसिंग धोनीच्या एका वाक्यामुळे जडेजाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chennai Super Kings


वाचा-भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल; किती, कधी आणि कुठे सामने होणार जाणून घ्या...

आयपीएलचा २०२२ सालचा हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यावेळी धोनीने संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर जडेजाने या मोसमात ८ सामन्यात चेन्नईच्या संघाचे नेतृत्व केले, परंतु जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला केवळ २ सामने जिंकता आले होते. त्याचबरोबर जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीवरही या गोष्टीचा वाईट परिणाम झाला होता. जडेजाने आयपीएल २०२२मध्ये १० सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये १९.३३ च्या सरासरीने ११६ धावा केल्या आणि ७.५२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना केवळ ५ विकेट घेतल्या.

जडेजाला चेन्नईच्या संघ व्यस्थापनाने कर्णधारपद सोडायला सांगितले. पण त्यानंतर जडेजा आणि चेन्नईच्या संघात मोठा वाद झाल्याचे म्हटले जात होते. जडेजाने त्यानंतर चेन्नईसाठी न खेळण्याचे ठरवले होते आणि तो पुढील काही सामन्यांसाठी मैदानात उतरलाही नाही. पण त्याचवेळी जडेजाला कर्णधारपदावरून काढण्यात धोनीचा हात असल्याचे आता समोर येत आहे.

वाचा-कोहली नाही तर रोहित शर्मा मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, आशिया चषकात सुवर्णसंधी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चेन्नईच्या संघातील याबाबती त्यांना माहिती दिली. चेन्नईच्या संघातील सूत्रांनी सांगितले की, "आयपीएलच्या या हंगामातील खराब कामगिरीमुळे धोनीला जडेजा ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आपले स्थान गमावू शकतो, असे वाटत होते. कारण त्यावेळी जडेजाचे नेतृत्वच नाही तर त्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली होत नव्हती. त्यामुळे जडेजाची अशीच कामगिरी राहिली तर त्याची निवड ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केली जाणार नाही, असे धोनीला वाटले. त्यामुळे जडेजाची कामगिरी सुधारावी आणि त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकात संधी मिळाली, ही गोष्ट धोनीने मांडली आणि त्यामुळेच जडेजाकडून चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले." त्यामुळे धोनीने एका वाक्यात जडेजाकडे संघाचे नेतृत्व का देऊ नये, हे सांगितले. कर्णधारपद नसल्यामुळे जडेजावर जास्त दबाव राहणार नाही आणि तो मुक्तपणे खेळू शकतो, असे धोनीला वाटत होते. हा विचार करूनच धोनीने आपले मत व्यक्त केले होते. पण त्यानंतर चेन्नईच्या संघात मोठा वाद झाला होता.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख