अ‍ॅपशहर

'त्या' दिवशी वाटले, मी अमिताभ बच्चन आहे; भारतीय क्रिकेटपटू!

टीम इंडियाने २००२ साली नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती मोहम्मद कैफने. त्याने युवराज सिंगसोबत १२१ धावांची भागिदारी करत विजय मिळवून दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2020, 1:24 pm
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने परदेशात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांमध्ये २००२ सालच्या नेटवेस्ट मालिकेचा समावेश होतो. ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. तेव्हा मैदानात उतरले मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग ही जोडी. या विजयात कैफने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अशी खेळी केली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात या विजयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. संघातील सिनिअर खेळाडू अपयशी ठरल्यानंतर ज्युनिअर्सनी शानदार विजय मिळवून दिला होता. या सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरवला आणि इंग्लंडच्या फ्लिंटॉफला उत्तर दिले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नेटवेस्ट चषक २००२


वाचा- गुड न्यूज: भारतीय क्रिकेटपटूला झाली कन्यारत्न!

१८ वर्षापूर्वी १३ जुलै २००२ रोजी भारतीय संघाने गांगुलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विजय मिळवला होता. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात नेटवेस्ट मालिकेतील फायनल सामना झाला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतीय संघाला ३२६ धावांचे आव्हान दिले होते. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. टीम इंडियाच्या चाहत्यांनी सामना पाहण्याचे सोडून दिले होते. पण युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला. कैफने या सामन्यात ८७ धावांची खेळी केली आणि पराभव विजयात बदलला.

वाचा- राजस्थानमध्ये पायलट उड्डाण घेणार... बबिता फोगटच्या ट्विटने उडाली खळबळ

या सामन्यात कैफ आणि युवराज यांनी १२१ धावांची भागिदारी केली. युवराज बाद झाल्यानंतर हरभजन सिंगने कैफची चांगली साथ दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या.


१८ वर्षापूर्वी मिळवलेल्या या विजयाबद्दल कैफ म्हणाला, त्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटला कायम स्वरुपी बदलून टाकले. त्या विजयामुळे आम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करू शकते हे दाखवून दिले. १९८३ मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या विजयानंतरचा हा सर्वात मोठा विजय ठरला.

वाचा- १८ वर्षे झाली, टीम इंडियाच्या त्या विजयाची झिंग अजून उतरलेली नाही!

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना कैफ म्हणाला, या विजयानंतर मी भारतात आलो तेव्हा अलहाबादमध्ये मला खुल्या जीपमधून नेण्यात आले. माझ्या घरी जाण्यासाठीचे अंतर पाच ते सहा किलोमीटर असून ते पार करण्यासाठी ४ तास लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी गर्दी केली. मी जेव्हा लहान होतो तेव्हा अमिताभ बच्चन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर युपीत जीपमधून फिरलेले पाहिले होते. त्या दिवशी वाटले की मी अमिताभ बच्चन आहे.

वाचा- टीम इंडियाच्या पहिल्या वनडेला झाली ४६ वर्ष; काय झालं होत 'त्या' सामन्यात!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज