अ‍ॅपशहर

रिषभ पंतला इतिहास रचण्याची संधी, धोनी आणि कोहलीसारख्या कर्णधारांनाही जमली नाही ही गोष्ट...

रिषभ पंतला आता इतिहास लिहिण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. जी गोष्ट महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या कर्णधारांना जमली नाही, ती गोष्ट आता पंतला करता येऊ शकते. पंतला यावेळी कर्णधारपदाची लॉटरी लागली होती. त्याच्या नशिबात हे कर्णधारपद होते आणि कदाचित नशिबात इतिहास लिहिण्याची गोष्टही असू शकेल. पंत कोणता इतिहास लिहू शकतो, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 19 Jun 2022, 9:16 pm
मुंबई : रिषभ पंतला या मालिकेत कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. पण त्याचवेळी पंतला यावेळी इचिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. जी गोष्ट महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या कर्णधारांना जमली नाही, ती गोष्ट आता पंतला करता येऊ शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रिषभ पंत (सौजन्य-ट्विटर)

रिषभ पंत आता कोणता इतिहास रचू शकतो, पाहा...आयपीएलनंतर भारताची ही मालिका खेळवण्यात येणार होती. त्यासाठी लोकेश राहुलला कर्णधारपद देण्यात आले होते. पण राहुलच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आणि आपण या मालिकेत खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर कर्णधारपदाची माळ ही रिषभ पंतच्या गळ्यात पडली. रिषभसाठी एक कर्णधार म्हणून ही पहिलीची संधी होती. त्यामुळे रिषभ या मालिकेत कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण रिषभला पहिले दोन सामना गमवावे लागले, पण त्यानंतरचे दोन्ही सामने जिंकत त्याने मालिकेत २-२ अशी बरोबरी संघाला करून दिली. आता पाचवा सामना जिंकत रिषभला इतिहास रचण्याची संधी आहे. जी गोष्ट आतापर्यंत धोनी आणि कोहलीसारख्या कर्णधारांना करता आली नाही तीआता रिषभला करता येणार आहे. कारण मायदेशात झालेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही ट्वेन्टी-२० मालिका भारताला आतापर्यंत जिंकता आलेली नाही. धोनी कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. ही मालिका २०१५ साली झाली होती आणि भारताला या मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघाने भारतात २०१९ साली दुसरी ट्वेन्टी-२० मालिका खेळली होती. यावेळी भारताचा कर्णधार हा विराट कोहली होता. यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यावेळीही भारताला विजय मिळवता आला नव्हता. पण आता ती संधी रिषभ पंतकडे चालून आली आहे. कारण भारताने यावेळी मालिका जिंकली तर रिषभ पंत हा मायदेशात दक्षिण आफ्रिकेला ट्वेन्टी-२० मालिकेत पराभूत करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज