अ‍ॅपशहर

Video: रोहित शर्माचा असा रुद्रावतार कधीच दिसला नाही, पाहा अस काय झालं १८व्या षटकात

Rohit Sharma: आशिया कपमध्ये रविवारी (४ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा ५ विकेटनी पराभव केला. या सामन्यात अशी एक घटना घडली जेथे कुल रोहित शर्मा प्रचंड संतापला पाहा काय झाले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2022, 1:03 am
दुबई: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन कट्टर देशात ८ दिवसाच्या आत २ क्रिकेट सामने झाले. गेल्या २८ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने ५ विकेटनी तर ४ सप्टेंबर रोजी झालेल्या लढतीत पाकिस्तानने ५ विकेटनी विजय मिळवला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma


विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानने ते एक चेंडू राखून पार केला. या सामन्यात भारताला विजयाची मोठी संधी चालून आली होती. मात्र ही संधी टीम इंडियाने गमावली.

वाचा- आठ वर्षानंतर भारताविरुद्ध पाकिस्तान जिंकला; रोहितचे कुठे चुकले; या ३ गोष्टींमुळे झाला पराभव

पाकिस्तानच्या डावात भारताकडून १८वे षटक रवी बिश्नोईने टाकले. या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर फलंदाज आसिफ अलीने हवेत शॉट मारला. पण अर्शदीप सिंगने अतिशय सोपा असा कॅच सोडला. हा एक कॅच सोडल्यामुळे भारताला सामना गमावण्याची वेळ आली.

वाचा- कोण आहे रयाल बर्ल? फक्त १८ चेंडूत जगजेत्या ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला


आसिफ अलीने मिळालेल्या संधीचा फायदा घेता आणि १९व्या षटकात भुवनेश्वरची जोरदार धुलाई केली. त्याने दुसऱ्या चेंडूवर षटकार तर अखेरच्या चेंडूवर चौकार मारला. भुवीने १९व्या ओव्हरमध्ये १९ धावा दिल्या. जेथे पाकिस्तानला १२ चेंडूत २६ धावा हव्या होत्या तेथे ६ चेंडूत ७ धावा असे समीकरण झाले. आसिफ अलीचा तो कॅच घेतला असता तर पाकिस्तानवर आणखी दबाव आला असता आणि भारतीय गोलंदाजांवर प्रेशर कमी झाले असते. अलीने ८ चेंडूत १६ धावा केल्या.

वाचा- रोहितच्या फक्त २ षटकारने झाले मोठे विक्रम; एकाच वेळी दोघा दिग्गजांना मागे टाकले

जेव्हा अर्शदीपने अलीचा सोपा कॅच सोडला तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा प्रचंड संतापला. रोहित हा मैदानावर शांत राहणारा कर्णधार आहे. अनेक तणावाच्या परिस्थितीत देखील तो शांत राहतो. पण अर्शदीपने इतका सोपा कॅच ते ही पाकिस्तान सारख्या देशाविरुद्धच्या सामन्यात सोडल्यावर क्रिकेट चाहत्यांना रोहितचा कधीही न पाहायला मिळालेला रुद्रअवतार दिसला.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख