अ‍ॅपशहर

कोहली नाही तर रोहित शर्मा मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, आशिया चषकात सुवर्णसंधी

Asia cup 2022 : कोहली या स्पर्धेत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल, असे बऱ्याच जणांना वाटत नाही. पण रोहित फक्त एका सामन्यात सचिनचा विक्रम मोडीत काढू शकतो. कारण जर रोहितने या स्पर्धेत ​​फक्त एक शतक जरी झळकावले तर त्याला सचिनचा विक्रम मोडता येऊ शकतो. रोहित सचिनचा कोणता विक्रम मोडू शकतो, पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Aug 2022, 7:23 pm
नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे विक्रम विराट कोहली मोडू शकेल, असे काही वर्षांपूर्वी सर्वांना वाटत होते. पण आता कोहली नाही तर रोहित शर्मा सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडू शकतो, असे समोर आले आहे. या महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma


वाचा-भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कुठे बुक करता येतील, जाणून घ्या लिंक आणि किंमत..

रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आशिया चषकात रोहित धावांचा डोंगर उभारू शकतो, असे म्हटले जात आहे. आतापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने आतापर्यंत आशिया चषक स्पर्धांमध्ये २३ सामन्यांमध्ये ५१.१० च्या सरासरीनं ९७१ धावा केल्या आहेत. रोहित हा विक्रम मोडण्याचा फारच जवळ पोहोचला आहे. सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी रोहितला आता फक्त ८९ धावांची गरज आहे. रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंतच्या २७ सामन्यांमध्ये ४२.४० च्या सरासरीनं ८८३ धावा आहेत. त्यामुळे या स्पर्धेत ८८ धावा जर रोहितने केल्या तर त्याची आणि सचिनची बरोबरी होऊ शकते. त्याचबरोबर रोहितने ८९ धावा केल्या तर आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतो. रोहितने यावेळी कोहली आणि धोनी यांनाही पिछाडीवर सोडले आहे.

कोहलीने आतापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धेत ७६६ धावा केल्या आहेत, तर धोनीच्या नावावर ६९० धावा आहेत. कोहली सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नाही. गेल्या जवळपास तीन वर्षांमध्ये कोहलीला एक शतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहली या स्पर्धेत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल, असे बऱ्याच जणांना वाटत नाही. पण रोहित फक्त एका सामन्यात सचिनचा विक्रम मोडीत काढू शकतो. कारण जर रोहितने या स्पर्धेत फक्त एक शतक जरी झळकावले तर त्याला सचिनचा विक्रम मोडता येऊ शकतो. त्यामुळे या आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असताना रोहित किती धावा करतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख