मुंबई: दक्षिण आफ्रिकेत २००७ साली झालेला टी-२० वर्ल्डकप कोणताही भारतीय क्रिकेट चाहता विसणार नाही. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताने साखळी फेरीत बॉल आउटमध्ये तर अंतिम फेरीत थरारक अशा सामन्यात पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव केला होता.
टी-२० वर्ल्डकप संदर्भातील अनेक किस्से याआधी तुम्ही वाचले असतील. पण आज आम्ही जो तुम्हाला किस्सा सांगणार आहोत तो कदाचित तुम्ही ऐकला किंवा वाचला असेल.
वाचा- 'मी शून्यावर बाद झालो आणि त्याच बॅटने रोहितने पहिले अर्धशतक झळकावले'
सध्या भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहे. अशा हिटमॅन रोहितकडे २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:ची बॅट नव्हती. ज्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले होते त्या स्पर्धेत रोहितने दुसऱ्याची बॅट घेऊन फलंदाजी केली होती.
भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या एका मुलाखतीत रोहितने या गोष्टीचा खुलासा केला. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहितने दिनेश कार्तिकची बॅट वापरली होती. त्या बॅटबद्दल बोलताना रोहित म्हणाला, असे नाही की मला ती बॅट खुप आवडली होती. सराव करताना मी ती बॅट दोन-तीन वेळा पाहिली होती. वर्ल्डकपवेळी माझ्याकडे स्वत:ची बॅटच नव्हती, सुपर बॅट होती ती मी जर चुकत नसले तर दिनेशची ती बॅट मी सात ते आठ वापरली. अजून देखील ती बॅट दिनेशकडे असेल.
वाचा- चुलत बहीणीशी लग्न करणार हा क्रिकेटपटू; साखरपुडा झाला आता...
इतक नव्हे तर दिनेशने दिलेल्या त्या बॅटने रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले होते. वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने ४० चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या. रोहितने महेंद्र सिंह धोनीसोबत ८५ धावांची भागिदारी देखील केली. धोनी ३३ चेंडूत ४५ धावा करून धावबाद झाला होता.
वाचा- चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी; प्रत्येक दोन वर्षांनी टी-२० वर्ल्डकप
रोहित मैदानावर आला तेव्हा भारताच्या ११ षटकात ४ बाद ६१ धावा होत्या. आफ्रिकेविरुद्धच्या त्या लढतीत रोहितच्या अर्धशतकामुळे भारताने ५ बाद १५३ धावसंख्या उभी केली. उत्तरादाखल आफ्रिकेला २० षटाकत ११६ धावा करता आल्या. या सामन्यात रोहितला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता
टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्या चार लढतीत रोहितला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पाचव्या लढतीत आफ्रिकेविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात नाबाद ५० धावा केल्या. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १६ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या होत्या.
टी-२० वर्ल्डकप संदर्भातील अनेक किस्से याआधी तुम्ही वाचले असतील. पण आज आम्ही जो तुम्हाला किस्सा सांगणार आहोत तो कदाचित तुम्ही ऐकला किंवा वाचला असेल.
वाचा- 'मी शून्यावर बाद झालो आणि त्याच बॅटने रोहितने पहिले अर्धशतक झळकावले'
सध्या भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहे. अशा हिटमॅन रोहितकडे २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:ची बॅट नव्हती. ज्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले होते त्या स्पर्धेत रोहितने दुसऱ्याची बॅट घेऊन फलंदाजी केली होती.
भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या एका मुलाखतीत रोहितने या गोष्टीचा खुलासा केला. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहितने दिनेश कार्तिकची बॅट वापरली होती. त्या बॅटबद्दल बोलताना रोहित म्हणाला, असे नाही की मला ती बॅट खुप आवडली होती. सराव करताना मी ती बॅट दोन-तीन वेळा पाहिली होती. वर्ल्डकपवेळी माझ्याकडे स्वत:ची बॅटच नव्हती, सुपर बॅट होती ती मी जर चुकत नसले तर दिनेशची ती बॅट मी सात ते आठ वापरली. अजून देखील ती बॅट दिनेशकडे असेल.
वाचा- चुलत बहीणीशी लग्न करणार हा क्रिकेटपटू; साखरपुडा झाला आता...
इतक नव्हे तर दिनेशने दिलेल्या त्या बॅटने रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले होते. वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने ४० चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या. रोहितने महेंद्र सिंह धोनीसोबत ८५ धावांची भागिदारी देखील केली. धोनी ३३ चेंडूत ४५ धावा करून धावबाद झाला होता.
वाचा- चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी; प्रत्येक दोन वर्षांनी टी-२० वर्ल्डकप
रोहित मैदानावर आला तेव्हा भारताच्या ११ षटकात ४ बाद ६१ धावा होत्या. आफ्रिकेविरुद्धच्या त्या लढतीत रोहितच्या अर्धशतकामुळे भारताने ५ बाद १५३ धावसंख्या उभी केली. उत्तरादाखल आफ्रिकेला २० षटाकत ११६ धावा करता आल्या. या सामन्यात रोहितला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता
टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्या चार लढतीत रोहितला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पाचव्या लढतीत आफ्रिकेविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात नाबाद ५० धावा केल्या. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १६ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या होत्या.