अ‍ॅपशहर

बुमराह इतका निर्दयी कसा काय वागू शकतो? रोहित वेदनेने तडपडत असताना पाहा काय केले

Rohit Sharma vs Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया लीसेस्टरशारयरविरुद्ध सराव सामना खेळत आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2022, 2:04 pm
लीसेस्टर: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघ लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना (Leicestershire Vs India Warm-Up Match) खेळत आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांची पोल-खोल झाली. सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सराव लढतीत जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah), चेतेश्वर पुजारा, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत हे चार भारतीय खेळाडू लीसेस्टरशायर संघाकडून खेळत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma


भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. लीसेस्टरशायरकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजीची सुरुवात केली. रोहित शर्मा प्रथमच एका सामन्यात जसप्रीत बुमराहला सामोरे जात होता. सामन्यातील सातव्या षटकात बुमराहने रोहितला एक इनस्विंग चेंडू टाकला जो रोहितच्या पोटाच्या थोडा खाली लागला आणि त्याला प्रचंड वेदना झाल्या. रोहितच्या वेदना पाहून टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले.

बुमराह असा कसा वागला

या सामन्यात बुमराह भारतीय संघाविरुद्ध खेळत होता. टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यावर पाठवलेल्या सर्व खेळाडूंना सराव मिळावा म्हणून भारताचे चार खेळाडू स्वत:च्या संघाविरुद्ध खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल बुमराह हे रोहितचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पण सराव सामन्यात जेव्हा त्याचा चेंडू रोहितला लागला तेव्हा बुमराहने रोहितची विचारपूस करणे तर दूरच पाहिले देखील नाही.

चेंडू लागल्यानंतर रोहित पिचपासून बाजूला झाला आणि वेदनेने खाली बसला पण बुमराह त्याला न पाहता पुन्हा रनअप घेण्यासाठी गेला. या उटल विकेकीपर असेलल्या ऋषभ पंतने रोहितची विचारपूस केली. रोहितला पाहण्यासाठी फिजिओ मैदानात आल्यावर देखील बुमराह रोहितच्या जवळ आला नाही तो लीसेस्टरशायरच्या खेळाडूंसोबत उभा होता. पंत मात्र रोहितच्या जवळ थांबला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे ६०.२ षटकांचा खेळ झाला. भारताने ८ बाद २४६ धावा केल्या. रोहितने २५ तर विराटने ३३ धावा केल्या. ८१ धावांवर टीम इंडियाचे ५ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर केएस भरतने ७० धावा करत डाव सावरला.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख