अ‍ॅपशहर

रोहित वि. विराट, कोण कुणावर भारी?

बांगलादेशविरुद्ध दिल्लीतील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सर्व जबाबदारी खांद्यावर घेत दमदार ८५ धावांची खेळी केली आणि विजय सुकर केला. त्याच्या या डावात सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा गोलंदाजांवर तुटून पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 10:41 am
नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध दिल्लीतील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सर्व जबाबदारी खांद्यावर घेत दमदार ८५ धावांची खेळी केली आणि विजय सुकर केला. त्याच्या या डावात सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा गोलंदाजांवर तुटून पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. गेल्या पाच वर्षात रोहितने अनेक ऐतिहासिक विक्रम केले आहेत, जे कर्णधार विराट कोहलीलाही जमले नाहीत. त्यामुळेच ‘रोहित करु शकतो, ते विराटही करु शकत नाही,’ हे माजी फलंदाज विरेंद्र सेहवागचं मत खरं ठरतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma vs virat kohli records in last five year
रोहित वि. विराट, कोण कुणावर भारी?


राजकोटमध्ये खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा दुसरा टी-२० सामना रोहितच्या कारकीर्दीतील १०० वा सामना होता, जो त्याने अविस्मरणीय बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ५०० पेक्षा जास्त धावा कुटल्या, ज्यात सलग तीन सामन्यात तीन शतकांचा समावेश होता. यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या वन डे विश्वचषकात त्याने सर्वच संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. विश्वचषकात पाच शतक ठोकण्याचा विक्रमही केला.

वाचा : षटकार ठोकण्यासाठी ताकदीची गरज नसते: रोहित शर्मा

वन डे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील रोहितचं गेल्या पाच वर्षातील रेकॉर्ड पाहिलं तर तो अनेक बाबींमध्ये विराटवर भारी भरला आहे. विराटने १४० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात ६८.४२ च्या सरासरीने ७०४८ धावा केल्या. या काळात विराटचा स्ट्राईक रेट १०३.२८ राहिला. हिटमॅन रोहितने याच काळात १५२ सामन्यात ५१.५० च्या सरासरीने ७००५ धावा केल्या. रोहितचा स्ट्राईक रेट १०५.९५ एवढा आहे, जे विराटपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं. विराट ३३ वेळा नाबाद राहिला, ज्यामुळे त्याची सरासरी जास्त आहे. तर सलामीला आलेला रोहित १४ वेळा नाबाद राहिला.

वाचा : राजकोटमध्ये 'रोहित'वादळ; बांगलादेशचा धुव्वा

शतकांच्या बाबतीत विराट आणि रोहित दोघेही समसमान आहेत. दोघांच्याही नावावर गेल्या पाच वर्षात २३-२३ शतकांची नोंद आहे. मात्र आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये रोहितने चार शतकं ठोकली, तर विराटला एकही शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर २७ शतकांची नोंद आहे. रोहितच्या २५४ षटकारांचाही यामध्ये समावेश होतो.

गेल्या पाच वर्षात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. टॉप-५ फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आहे, ज्याने १३३ सामन्यात ४६.४७ च्या सरासरीने ५५३० धावा केल्या. त्याच्या नावावर १० शतकं आहेत. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा ज्यो रुट आहे. रुटने १३० सामन्यात १४ शतकांसह ५४३४ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आहे, ज्याने १२७ सामन्यात १२ शतकांसह ४८९६ धावा केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज