अ‍ॅपशहर

T 20 World Cup : भारताच्या १५व्या खेळाडूची घोषणा कधी होणार, रोहित शर्माचा मोठा खुलासा...

Team India : भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रवाना झाला. पण यावेळी भारतीय संघात १४ खेळाडूच होते. एका संघात किमान १५ खेळाडू असावे लागतात, पण भारत मात्र आज १४व्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारताने १४ खेळाडूंची का निवड केली आणि आता १५व्या खेळाडूची निवड कधी करण्यात येणार आहे, जाणून घ्या..

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Oct 2022, 6:12 pm
मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी सर्व संघ १५ खेळाडूंना बरोबर घेऊन गेले, पण भारताचा संघ मात्र १४ खेळाडूंबरोबर गेला. आता भारताच्या १५व्या खेळाडूची घोषणा नेमकी कधी करण्यात येणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. पण रोहित शर्माने याबाबत एक मोठा खुलासा केल्याचे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 world cup 2022
सौजन्य-ट्विटर


भारतीय संघ कधीपर्यंत १५व्या खेळाडूच्या प्रतिक्षेत असेल, ही गोष्ट आत समोर आली आहे. भारतीय संघ येत्या काही तासांमध्ये ऑस्ट्रेलियात दाखल होईल. त्यानंतर तिथे काही काळ भारतीय संघ विश्रांती घेणार आहे. विश्रांतीनंतर भारतीय संघ नेट प्रॅक्टीसला सुरुवात करेल आणि त्यानंतर त्यांना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. पण हे सर्व भारताला आता १४ खेळाडूंनिशी करावे लागणार असल्याचे समोर येत आहे. त्यानंतर भारताच्या १५व्या खेळाडूची निवड केली जाईल, असे म्हटले जात आहे. सूत्रांनी १५व्या खेळाडूबाबत माहिती दिली आहे.

रोहितने यावेळी १५व्या खेळाडूबाबत एक गोष्ट सांगितली आहे. रोहित म्हणाला की, " भारताचा १५वा खेळाडू कोण असेल, याबाबत जरदार चर्चा सुरु आहे. पण या खेळाडूची निवड कधी करायची, हे आम्ही जवळपास निश्चित केले आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात दाखल होऊ, त्यानंतर आम्ही तिसऱ्या वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊ. त्यानंतर आम्ही १५वा खेळाडू जाहीर करणार आहोत." त्यामुळे आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर भारताच्या १५व्या खेळाडूची निवड करण्यात येईल आणि संघातील राखीव खेळाडूंबरोबर तो ऑस्ट्रेलियाला जाईल, असे म्हटले जात आहे.

भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी (T20 WORLD CUP 2022) ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण यावेळी भारतीय संघात १४ खेळाडूच होते.विश्वचषकासाठी एका संघात किमान १५ खेळाडू असावे लागतात, पण भारत मात्र आज १४व्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण भारताचा हा १५वा खेळाडू नेमका कोण असणार आहे, याबाबतची माहिती आता सर्वांना मिळाली आहे. शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीची निवड कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज