अ‍ॅपशहर

ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्यावर CSKने केले होते रिटेन...

ऋतुराज गायकवाडने यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयरपीएलमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत सर्वाधिक धावा पटकावण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने अव्वल चार खेळाडूंमध्ये ऋतुराजची निवड करत त्याला संघात कायम ठेवले होते.

Maharashtra Times 8 Dec 2021, 8:28 am
मुंबई : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड चांगलाच चमकला होता. त्यामुळेच यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ऋतुराजला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत केलेल्या दिमाखदार कामगिरीचे फळ ऋतुराजला कर्णधारपदाच्या रुपात मिळाले आहे. महाराष्ट्राच्या संघाने विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्णधारपदाची माळ आता ऋतुराजच्या गळ्यात घातली आहे. त्याचबरोबर राहुल त्रिपाठीला यावेळी महाराष्ट्राच्या संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. राहुलनेही कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये चमकलेल्या दोन्ही खेळाडूंना यावेळी महाराष्ट्राच्या संघाने मोठी जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ऋतुराज गायकवाड (सौजन्य-ट्विटर)


गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आय़पीएलमध्ये ऋतुराजला करोना झाला होता. त्यामुळे चेन्नईकडून काही सामने त्याला खेळता आले नव्हते. पण महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गेल्यावर्षी झालेल्या अखेरच्या काही सामन्यांमध्ये ऋतुराजने दमदार फलंदाजी केली होती. पण यावर्षी ऋतुराजने ती सर्व कसर भरून काढल्याचे पाहायला मिळाले. कारण यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ऋतुराजच्या नावावर होत्या. त्यामुळेच ऑरेंज कॅपही ऋतुराजला देण्यात आली, त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदामध्येही ऋतुराजचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पुढच्या आयपीएलसाठी ऋतुराजला संघात रिटेन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ऋतुराज हा चेन्नई सुपर किंग्सचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या संघाने त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे आता ऋतुराजच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाची कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. महाराष्ट्राचे या स्पर्धेतील सामने राजकोट येथे खेळवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राच्या संघात कोणाला संधी मिळाली आहे, पाहा...ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), यश नाहर, नौशाद शेख, अझिम काझी, अंकित बावणे, शम्शुझमा काझी, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, अक्षय पालकर, दिव्यांग हिंगणेकर, जगदीश झोपे, स्वप्निल फुलपगार, अवधुत दांडेकर, तरनजित सिंग ढिल्लोन, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पनव शाह, धनराज परदेसी.

महत्वाचे लेख