सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव गडगडला. भारतीय संघाने आज ३ बाद २७२ धावांवरून खेळायला सुरुवात केली असली तरी त्यांना साडे तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. पण भारतीय संघ गडगडण्याची तीन मोठी कारणं आता समोर आली आहेत.
पहिलं कारण...
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टीही ही थोडीशी ओलसर होती आणि त्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झाला. पाऊस पडल्यावर वेगवान गोलंदाजांना चांगला वेग आण स्विंग मिळत असतो. पण त्यावेळी फलंदाजांनी थोडाकाळ संयमाने खेळणं महत्वाचं असतं. कारण पहिल्या सत्रात खेळपट्टी ही ताजीतवानी असते आणि पावसामुळे वेगवान गोलंदाजांना अतिरीक्त मदत मिळाली होती. त्यामुळे या गोष्टीचा फायदा यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झाला.
दुसरं कारण...
भारताचा डाव गडगडण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे फलंदाजांनी केलेल्या चुका. कारण खेळपट्टी ही वेगवान गोलंदजांना पोषक होती. पण त्याचबरोबर चांगले ऊनही आलेले होते. त्यामुळे भारताच्या फलंदाजांनी अर्धा ते पाऊस तास संयमाने फलंदाजी केली असती तर त्यांना त्यानंतर चांगली धावसंख्या उभारता आली असती. पण भारताचे फलंदाज यावेळी थोडे आक्रमक झाले. संयमी फलंदाजी करण्याऐवजी ते धावा जमवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. धावा करण्याच्या नादात त्यांच्याकडून चांगले फटके मारले गेले नाहीत. हीच मोठी चुक भारताच्या फलंदाजांनाकडून तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झाल्याचे पाहायला मिळाले.
तिसरं कारण...खेळपट्टी ही गोलंदजांना पोषक असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी यावेळी भारताच्या फलंदाजांच्या स्टम्पजवळ जास्त मारा केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी जास्त चेंडू स्टम्पच्या बाहेर टाकले नाहीत. स्टम्पच्या लाईनमध्ये आलेल्या चेंडूंवर फटकेबाजी करण्याचा मोह भारताच्या फलंदाजांना आवरता आला नाही आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज यावेळी यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
पहिलं कारण...
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टीही ही थोडीशी ओलसर होती आणि त्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झाला. पाऊस पडल्यावर वेगवान गोलंदाजांना चांगला वेग आण स्विंग मिळत असतो. पण त्यावेळी फलंदाजांनी थोडाकाळ संयमाने खेळणं महत्वाचं असतं. कारण पहिल्या सत्रात खेळपट्टी ही ताजीतवानी असते आणि पावसामुळे वेगवान गोलंदाजांना अतिरीक्त मदत मिळाली होती. त्यामुळे या गोष्टीचा फायदा यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झाला.
दुसरं कारण...
भारताचा डाव गडगडण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे फलंदाजांनी केलेल्या चुका. कारण खेळपट्टी ही वेगवान गोलंदजांना पोषक होती. पण त्याचबरोबर चांगले ऊनही आलेले होते. त्यामुळे भारताच्या फलंदाजांनी अर्धा ते पाऊस तास संयमाने फलंदाजी केली असती तर त्यांना त्यानंतर चांगली धावसंख्या उभारता आली असती. पण भारताचे फलंदाज यावेळी थोडे आक्रमक झाले. संयमी फलंदाजी करण्याऐवजी ते धावा जमवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. धावा करण्याच्या नादात त्यांच्याकडून चांगले फटके मारले गेले नाहीत. हीच मोठी चुक भारताच्या फलंदाजांनाकडून तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झाल्याचे पाहायला मिळाले.
तिसरं कारण...खेळपट्टी ही गोलंदजांना पोषक असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी यावेळी भारताच्या फलंदाजांच्या स्टम्पजवळ जास्त मारा केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी जास्त चेंडू स्टम्पच्या बाहेर टाकले नाहीत. स्टम्पच्या लाईनमध्ये आलेल्या चेंडूंवर फटकेबाजी करण्याचा मोह भारताच्या फलंदाजांना आवरता आला नाही आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज यावेळी यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.