अ‍ॅपशहर

Video : पंतने पुन्हा माती खाल्ली; विराट कोहलीनं दिली अशी तिखट रिअ‍ॅक्शन

IND vs SA : या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ६५ आणि सलामीवीर शिखर धवनने ६१ धावा केल्या. श्रेयस अय्यरही (२६) काही कमाल करू शकला नाही. सूर्यकुमार यादव हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ३९ धावांवर बाद झाला.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 24 Jan 2022, 3:42 pm
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ धावांनी जिंकला. २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया २८३ धावांपर्यंत पोहोचू शकली आणि ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sa vs ind virat kohli deadly stare to rishabh pant after golden duck against south africa
Video : पंतने पुन्हा माती खाल्ली; विराट कोहलीनं दिली अशी तिखट रिअ‍ॅक्शन


वाचा- विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान; चाहत्यांनी दिला टोकाचा इशारा

जेव्हा पंत फलंदाजीला आला, तेव्हा संघाची धावसंख्या १ बाद ११६ होती. पंत आणि कोहली ही जोडी चांगली भागीदारी करेल, अशी शक्यता वाटत होती, पण फेहलुकवायोच्या चेंडूवर पंतने क्रीजच्या दोन पावले पुढे येत ओव्हर डीप पॉईंटवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. आणि तिथंच फसला. सिसांडा मगालाने त्याचा सोपा झेल टिपला. पंतच्या या कृतीमुळे कोहली चांगलाच संतापलेला दिसत होता.

वाचा- विजयाच्या उंबरठ्यावर बाद झाला दीपक चाहर; आयुष्यभर या गोष्टीचे...


वाचा- वामिकाचा फोटो व्हायरल झाल्यावर विराटने हात जोडले

रिषभ पंत पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले आणि तो पंतकडे पाहत उभा होता. खरे तर पंत अतिशय बेजबाबदार शॉट खेळून मैदानातून बाहेर पडला. संपूर्ण मालिकेत पंतच्या बॅटने तीन डावात ३३.६७ च्या सरासरीने एकूण १०१ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात १७ आणि दुसऱ्या सामन्यात ८५ धावा केल्या.


भारताचा ४ धावांनी पराभव
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था एक वेळ ७ बाद २२३ अशी दयनीय झाली होती. पराभवाचे सावट संघावर दिसत होते. यावेळी दीपक चहरने ३४ चेंडूत शानदार ५४ धावा करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. २७८ चा आकडा धावफलकावर दिसत असताना चहर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह (१२) आणि युझवेंद्र चहल (२) यांच्या विकेट ठरावीक अंतराने पडल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने जिंकलेला सामना जवळपास गमावला.

वाचा- कोणत्याही भारतीय कर्णधारावर अशी वेळ आली नाही; राहुलच्या नावावर झाला नकोसा विक्रम

आफ्रिकेचा क्लीन स्वीप
एकदिवसीय मालिकेतील एकही सामना भारत जिंकू शकला नाही आणि आफ्रिकेने भारताला ३-० असा क्लीन स्वीप दिला. २०२० नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाला ३ किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. २०२० मध्ये न्यूझीलंडने त्यांच्या घरच्या मैदानावर भारताचा ३-० असा पराभव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज