मुंबई: पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, शक्तीहिन असल्याचा समज काहींचा असतो. मात्र, माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ही बाब मान्य नाही. आपले अश्रू दाखवणे म्हणजे कोणतीही शरमेची गोष्ट नाही, असं स्पष्ट मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे. आतंरराष्ट्रीय पुरुष दिन सप्ताहनिमित्ताने सचिनने सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहीले आहे.
पुरुषांनी रडू नये, तो रडणं म्हणजे कमजोर असल्याचा समज समाजात आहे. हा समज बदलायला हवा असे सचिनने म्हटले आहे. अश्रूंना मोकळी वाट करून देणे यात कोणतीही शरमेची बाब नाही. जी गोष्ट आपल्याला आयुष्यात मजबूत करते ती गोष्ट का आपण का नाकारावी? असा सवालही सचिनने विचारला आहे. आपल्याला लहानपणापासून पुरुषांनी रडू नये असे शिकवले जाते. रडल्यामुळे पुरुष कमजोर बनतात. मी हाच समज मनात बाळगून मोठा झालो. मात्र, माझी समज चुकीची होती. त्यामुळेच मी हे पत्र लिहीत असल्याचे सचिनने म्हटले. मी आयुष्यात केलेल्या संघर्षामुळे मी या टप्प्यावर आलो असल्याचे सचिनने नमूद केले.
रडणं ही कमजोर असल्याचे प्रतिक नसल्याचे सचिन म्हणतो. आपलं दु:ख दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी मोठ्या हिंमतीची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही एक अधिक चांगली व्यक्ती बनू शकता. पुरुषांनी काय करावे आणि काय करू नये या मानसिकेतून, जोखडातून बाहेर पडावे असंही मास्टर ब्लास्टरने म्हटले.
सचिनने म्हटले की, पुरुषांनादेखील भिती, शंका आणि इतरही समस्यांचा सामना करावा लागेल आणि या दरम्यान तुमच्या डोळ्यांतून अश्रू निघत असेल तर ही सामान्य बाब आहे. कधीतरी तुमच्या पदरी अपयश आलं आणि तुम्हाला रडून आपलं मन मोकळं करण्याची इच्छा होत असेल. मात्र, तुम्ही रडत नाहीत. आपले अश्रू थांबवता आणि मनाला बजावता की रडणं हे पुरुषांचे काम नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला अलविदा करतानाच्या दिवसाची आठवण सचिनने काढली. त्यावेळी आपल्या निरोपाचे भाषण करताना आणि मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परताना सचिन रडला होता. त्या दिवसाची आठवण करत सचिनने म्हटले की, त्या दिवशी माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. त्या विचारांना मनात ठेऊ शकत नव्हतो आणि मी त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. जगासमोर माझ्या भावनांचा बांध फुटू दिला आणि या सगळ्यानंतर मन: शांती लाभली असल्याचे सचिनने नमूद केले.
पुरुषांनी रडू नये, तो रडणं म्हणजे कमजोर असल्याचा समज समाजात आहे. हा समज बदलायला हवा असे सचिनने म्हटले आहे. अश्रूंना मोकळी वाट करून देणे यात कोणतीही शरमेची बाब नाही. जी गोष्ट आपल्याला आयुष्यात मजबूत करते ती गोष्ट का आपण का नाकारावी? असा सवालही सचिनने विचारला आहे. आपल्याला लहानपणापासून पुरुषांनी रडू नये असे शिकवले जाते. रडल्यामुळे पुरुष कमजोर बनतात. मी हाच समज मनात बाळगून मोठा झालो. मात्र, माझी समज चुकीची होती. त्यामुळेच मी हे पत्र लिहीत असल्याचे सचिनने म्हटले. मी आयुष्यात केलेल्या संघर्षामुळे मी या टप्प्यावर आलो असल्याचे सचिनने नमूद केले.
रडणं ही कमजोर असल्याचे प्रतिक नसल्याचे सचिन म्हणतो. आपलं दु:ख दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी मोठ्या हिंमतीची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही एक अधिक चांगली व्यक्ती बनू शकता. पुरुषांनी काय करावे आणि काय करू नये या मानसिकेतून, जोखडातून बाहेर पडावे असंही मास्टर ब्लास्टरने म्हटले.
सचिनने म्हटले की, पुरुषांनादेखील भिती, शंका आणि इतरही समस्यांचा सामना करावा लागेल आणि या दरम्यान तुमच्या डोळ्यांतून अश्रू निघत असेल तर ही सामान्य बाब आहे. कधीतरी तुमच्या पदरी अपयश आलं आणि तुम्हाला रडून आपलं मन मोकळं करण्याची इच्छा होत असेल. मात्र, तुम्ही रडत नाहीत. आपले अश्रू थांबवता आणि मनाला बजावता की रडणं हे पुरुषांचे काम नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला अलविदा करतानाच्या दिवसाची आठवण सचिनने काढली. त्यावेळी आपल्या निरोपाचे भाषण करताना आणि मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परताना सचिन रडला होता. त्या दिवसाची आठवण करत सचिनने म्हटले की, त्या दिवशी माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. त्या विचारांना मनात ठेऊ शकत नव्हतो आणि मी त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. जगासमोर माझ्या भावनांचा बांध फुटू दिला आणि या सगळ्यानंतर मन: शांती लाभली असल्याचे सचिनने नमूद केले.