अ‍ॅपशहर

कर्णधारपद गेलं तरीही एन्जॉन करतोय, शिखर धवन पहिल्या सामन्यानंतर असं का म्हणाला पाहा...

team India : शिखर धवनने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली. धवनने ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. त्यामुळेच भारताला यावेळी दमदार विजय मिळवता आला. धवन आणि शुभनल गिल या दोघांनीच दमदार फलंदाजी करत भारताला झिम्बाब्वेचे आव्हान पार करून दिले. सामना संपल्यावर धवनने खास मुलाखत दिली, त्यावेळी तो नेमकं काय म्हणाला पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 18 Aug 2022, 7:51 pm
हरारे : शिखर धवनसारखी वाईट गोष्ट कोणाच्या आयुष्यात घडू नये, असा विचार भारताचे चाहते करत आहेत. कारण झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण लोकेश राहुल फिट ठरला आणि त्यानंतर धवनकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. या सर्व प्रकरणामुळे चाहतेही नाराज झाले होते. कर्णधारपद गेले असले तरी आपण एन्जॉय करत असल्याचे धवनने पहिला सामना संपल्यावर म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india


वाचा-कर्णधारपद काढून घेतल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच सौडले मौन

लोकेश राहुलबाबत धवन काय म्हणाला होता, जाणून घ्या...
"लोकेश राहुलचे संघात पुनरागमन झाले ही चांगली बाब आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. तो भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. आशिया कपपूर्वीचा हा दौरा लोकेश राहुलसाठी महत्त्वाचा ठरणार आहे," असे धवनने सामना सुरु होण्यापूर्वी म्हटले होते.

सामना संपल्यावर धवनने नेमकं काय म्हटलं, जाणून घ्या...
पहिला सामना संपल्यावर धवन म्हणाला की, " मी गिलबरोबर फलंदाजीचा चांगला आनंद घेत आहे, गिलसारख्या युवा खेळाडूबरोबर फलंदाजी करताना मलाही तरुण झाल्यासारखे वाटते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात माझ्याकडून चांगली कामगिरी झाली होती, तेच सातत्य मला यावेळीही ठेवता आले. एकदा सेट झालो की, मला मोठी खेळी साकारता येईल, हे मला माहिती होते. त्यामुळे मी सुरुवातीला थोडा वेळ घेतला. गिलसोबत मी चांगल्या लयीत फलंदाजी करत होतो. त्याचबरोबर स्ट्राइक रोटेट करणेही माझ्याकडून होत होते. स्लिपमध्ये माझ्याकडून चांगली फिल्डींगही झाली. भारतीय संघानेही यावेळी दमदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दीपक चहरने पुनरागमन करत असताना तीन विकेट्स मिळवल्या आणि हीच गोष्ट आमच्या पथ्यावर पडली."

वाचा-भारताने कसा साकारला झिम्बाब्वेवर विजय, जाणून घ्या ही पाच कारणं...

शिखर धवनने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली. धवनने ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. त्यामुळेच भारताला यावेळी दमदार विजय मिळवता आला. धवन आणि शुभनल गिल या दोघांनीच दमदार फलंदाजी करत भारताला झिम्बाब्वेचे आव्हान पार करून दिले. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात सर्वांच्या नजरा धवनवर असतील.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख