अ‍ॅपशहर

'प्रतिभा पाहून खेळाडूंची संघात निवड केली जाते, फिरण्यासाठी नाही' : राहुल द्रविड

SL vs IND :भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना जिंकत श्रीलंकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद पणाला लावतील.

Lipi 29 Jul 2021, 3:50 pm
कोलंबो : भारतीय क्रिकेट संघातील जवळपास नऊ खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीत श्रीलंकेविरूद्ध टी-20 मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात उर्वरित 11 खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम selectors dont pick you to be on holiday says rahul dravid on players chosen in squad
'प्रतिभा पाहून खेळाडूंची संघात निवड केली जाते, फिरण्यासाठी नाही' : राहुल द्रविड


वाचा- भुवनेश्वर कुमारचा खास विक्रम; आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकरिया यांनी बुधवारी (28 जुलै) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. या खेळाडूंच्या निवडीबाबतच्या प्रतिक्रियांवर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपले मत मांडले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या दौर्‍यावर ज्यांची निवड झाली, ते भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पूर्णपणे तयार आहेत.

वाचा- Video: भारतीय खेळाडूने घेतलेला कॅच पाहून अंपायर झाले हैराण, दोन वेळा...

द्रविड म्हणाले की, “जेव्हा आम्ही एकदिवसीय मालिका जिंकली, तेव्हा आम्ही शेवटच्या सामन्यात काही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा विचार केला. येथील परिस्थितीनेच आम्हाला मालिका जिंकण्यापूर्वी असे करण्यास भाग पाडले, पण माझा ठाम विश्वास आहे की, जर तुम्हाला भारताकडून खेळण्यासाठी निवडले गेले असेल, मग ते 15 खेळाडू असोत वा 20, तुम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहात. बेंचवर बसण्यासाठी किंवा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तुमची अंतिम 15मध्ये संघ निवडकर्त्यांनी निवड केलेली नसते.

वाचा- अतानूच्या 'परफेक्ट १०' मागे होती पत्नी दीपिकाकुमारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

द्रविड पुढे म्हणाले की, '20 तरुण खेळाडूंची संघात निवड केली गेली, जे सर्वोत्तम खेळ करून इथपर्यंत पोहोचले आहेत. ही गोष्ट भारतासारख्या देशात नक्कीच सोपी नाही. जे खेळाडू पोहोचले ते पात्र होते. संघातील सर्व खेळाडूंना तुम्ही एकाच वेळी खेळवू शकत नाही. अधिकाधिक खेळाडूंना संधी देऊ शकलो, ही चांगली गोष्ट आहे.

वाचा- Tokyo Olympics 2020 : बीच व्हॉलीबॉलमध्ये बिकिनी घालण्यावरून वाद; महिला खेळाडूंनी केला विरोध

इथपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी ही जागा कष्टाच्या जोरावर मिळविली आहे, असं द्रविडला वाटतं. श्रीलंका मालिकेपूर्वी एकही सामना न खेळलेल्या पाचही खेळाडूंनी येथे किमान एक सामना खेळला आहे. पदार्पण केलेल्या नवोदित खेळाडूंना या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा करून घेता आला नाही, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा रोमहर्षक सामन्यात चार विकेटने पराभव स्वीकारावा लागला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज