लखनौ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरने भन्नाट कामगिरी केली. पण शार्दुलला आता या मेहनततीचं फळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शार्दुलसाठी आता अजून एक सर्वात मोठी आनंदाची बातमी येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
पहिल्या वनडे सामन्यात शार्दुलने भन्नाट मारा केला आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. शार्दुलने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा आणि जेमन मलान यांना बाद केले आणि दक्षिणआफ्रिकेचे कंबरडे मोडले. शार्दुल आता वनडे मालिकेत खेळणार आहेच. पण त्याच्यासाठी आता अजून एक गूड न्यूज येऊ शकते, असे दिसत आहे.
भारतीय सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आता वेगवान गोलंदाज शोधण्याच्या तयारीत आहे. बुमरा आता विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराच्या जागी आता शमीला भारताच्या १५ सदस्यीय संघात स्थान देणार असल्याचे दिसत आहे. पण जर शमी १५ सदस्यीय संघात गेला तर राखीव खेळाडूमध्ये कोणाला संधी द्यायची, हा विचार भारतीय संघ करत आहे. त्यामुळे आता विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.
शमीसाठी रोहित आणि द्रविड यांचा अट्टाहास...
बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
शमीची अजूननही फिटनेस टेस्ट घेण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही टेस्ट होईल आणि त्याचा निकाल जाहीर होईल तेव्हा भारताला १५वा खेळाडू मिळू शकतो. जर शमी फिट असेल तर तो भारताचा १५वा खेळाडू असेल, तर तो फिट नसला तर बुमराच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक १५ वा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. शमीसाठी रोहित आणि द्रविड आग्रही आहेत. त्यामुळेच ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे या टेस्टची उत्सुकता सर्वांनाच असेल.
पहिल्या वनडे सामन्यात शार्दुलने भन्नाट मारा केला आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. शार्दुलने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा आणि जेमन मलान यांना बाद केले आणि दक्षिणआफ्रिकेचे कंबरडे मोडले. शार्दुल आता वनडे मालिकेत खेळणार आहेच. पण त्याच्यासाठी आता अजून एक गूड न्यूज येऊ शकते, असे दिसत आहे.
भारतीय सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आता वेगवान गोलंदाज शोधण्याच्या तयारीत आहे. बुमरा आता विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराच्या जागी आता शमीला भारताच्या १५ सदस्यीय संघात स्थान देणार असल्याचे दिसत आहे. पण जर शमी १५ सदस्यीय संघात गेला तर राखीव खेळाडूमध्ये कोणाला संधी द्यायची, हा विचार भारतीय संघ करत आहे. त्यामुळे आता विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.
शमीसाठी रोहित आणि द्रविड यांचा अट्टाहास...
बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
शमीची अजूननही फिटनेस टेस्ट घेण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही टेस्ट होईल आणि त्याचा निकाल जाहीर होईल तेव्हा भारताला १५वा खेळाडू मिळू शकतो. जर शमी फिट असेल तर तो भारताचा १५वा खेळाडू असेल, तर तो फिट नसला तर बुमराच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक १५ वा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. शमीसाठी रोहित आणि द्रविड आग्रही आहेत. त्यामुळेच ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे या टेस्टची उत्सुकता सर्वांनाच असेल.