अ‍ॅपशहर

कर्णधारदावरून काढल्यानंतर शिखर धवनने पहिल्यांदाच मौन सोडले, पाहा नेमकं काय म्हणाला...

Shikhar Dhawan : झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनकडून तडकाफडकी कर्णधारपद काढून लोकेश राहुलकडे देण्यात आले होते. याबद्दल धवन आतापर्यंत काहीच बोलला नव्हता. पण आता याबाबत धवनने याबाबत मौन सोडले आहे. धवनने पहिल्यांदाच याबाबत आपील पहिली प्रतिक्रीया दिली आहे. कर्णधारपदावरून काढल्याबाबत धवन यावेळी नेमकं काय म्हणाला आहे, जाणून घ्या धवनच्या मन की बात...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 24 Nov 2022, 5:47 pm
ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार शिखर धवनने एक मोठे वक्तव्य केले आहे. धवनला काही दिवसांपूर्वी तडकाफडकी कर्णधारपदावरून काढण्यात आले होते. या सर्व गोष्टींवर पहिल्यांदाच धवनने मौन सोडले आहे आणि आपले मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs NZ
सौजन्य-ट्विटर


भारतीय संघ काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यासाठी पहिल्य़ांदा धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण त्यानंतर लोकेश राहुल हा फिट झाला आणि त्याला थेट बीसीसीआयने धवनकडून नेतृत्व काढून घेतले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचे नेतृत्व राहुलकडे सोपवले होते. हा भारतीय खेळाडूंबरोबर चाहत्यांसाठीही एक मोठा धक्का होता. पण याबाबत धवनने यापूर्वी एकही वक्तव्य केले नव्हते. पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी धवनने स्पष्टपणे यावर आपले मत व्यक्त केले आहे.

धवन म्हणाला, "मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला भारताचे कर्णधारपदाची संधी मिळाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने राहुलचे कर्णधारपद भूषवले होते. राहुलला झिम्बाब्वेमध्ये कर्णधार बनवण्यात आले, कारण तो मुख्य संघाचा उपकर्णधार होता. त्या मालिकेनंतर तो आशिया कपमध्ये खेळणार होता आणि रोहितला दुखापत झाल्यास राहुलला कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिले असते. त्यामुळे त्याला झिम्बाब्वेमध्ये कर्णधार बनवलेले, असे मला वाटते. पण याबद्दल मला वाईट वाटले नाही. कारण तो एक प्रक्रीयेचा एक भाग आहे. सध्याच्या घडीला मी फक्त वनडेमध्येच खेळत आहे. हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून असते. मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतोय ही देवाची कृपा आहे. जेव्हा मी तिन्ही फॉरमॅट खेळायचो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण आता माझ्यावर संघाची मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी सर्वपरीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात माझ्याकडून कर्णधारपद काढून राहुलकडे देण्यात आले, या गोष्टीचे मला वाईट वाटले नाही. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध माझ्याकडे कर्णधारपद देण्यात आले होते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही मीच कर्णधार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे मला वाईट वाटले नाही."

सध्याच्या घडीला धवन हा फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे आणि भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे आहे. आता पुढच्या वर्षी वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकात धवनकडेच कर्णधारपद राहणार की अजून कोणत्या खेळाडूकडे सुपूर्द करण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख