अ‍ॅपशहर

कर्णधारपद काढून घेतल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच सौडले मौन, पहिल्या सामन्यापूर्वी म्हणाला...

team india : भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आला असून, संघाचे उपकर्णधारपद धवनकडे आहे. या दौऱ्यात सुरुवातीला धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. नंतर लोकेश राहुलचा समावेश करण्यात आल्याने त्याला उपकर्णधार करण्यात आले. पण आता पहिल्या सामन्याला फक्त काही तास शिल्लक असताना धवनने आपले मत व्यक्त केले आहे, धवन यावेळी काय म्हणाला पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 17 Aug 2022, 10:54 pm
हरारे : झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी पहिल्यांदा शिखर धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. पण त्यानंतर लोकेश राहुल हा फिटनेस टेस्ट पास झाला आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला. यावेळी राहुलचा फक्त संघात समावेश करण्यात आला नाही तर धवनकडून कर्णधारपद काढण्यात आले आणि राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. या सर्व घटनांनंतर पहिल्या सामन्याला काही तास शिल्लक असताना धवनने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india
सौजन्य-ट्विटर


‘भारतीय संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास, माझ्या अनुभवाची देवाणघेवाण करण्यास मी सदैव तत्पर असतो,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवन याने व्यक्त केली. भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आला असून, संघाचे उपकर्णधारपद धवनकडे आहे. या दौऱ्यात सुरुवातीला धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. नंतर लोकेश राहुलचा समावेश करण्यात आल्याने त्याला उपकर्णधार करण्यात आले.

भारत-झिम्बाब्वेदरम्यान तीन सामन्यांची वन-डे क्रिकेट मालिका होणार आहे. यातील पहिली वन-डे १८ ऑगस्टला होईल. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत धवन म्हणाला, ‘लोकेश राहुलचे संघात पुनरागमन झाले ही चांगली बाब आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. तो भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. आशिया कपपूर्वीचा हा दौरा लोकेश राहुलसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.’ मी पहिल्यांदा येथे २०१३-१४मध्ये आलो होतो. त्या वेळी डंकन फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. युवा खेळाडूंच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मला नेहमीच आवडते, असेही धवन म्हणाला.

भारतीय संघ २०१६नंतर प्रथमच झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्या वेळी भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळला होता. यातील एक टी-२० जिंकण्यात झिम्बाब्वेला यश आले होते. यानंतर भारत-झिम्बाब्वे प्रथमच आमनेसामने येणार आहेत. धवन म्हणाला, ‘झिम्बाब्वे संघ बांगलादेशविरुद्ध जिंकला आहे. ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. असेही क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला कमी लेखून चालत नाही.’ हा शुभमन गिल, आवेश खान, ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचेही धवनने सांगितले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख