अ‍ॅपशहर

'विराटने नकार दिला म्हणून...'; कर्णधारपद काढून घेण्याची गांगुलीने सांगितली पूर्ण कहानी

virat kohli भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग असेल.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 10 Dec 2021, 11:58 am
नवी दिल्ली : क्रिकेट बोर्ड आणि संघ निवड समितीने मिळून रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. विराट कोहलीच्या जागी त्याला कर्णधार बनविण्यात आले आहे. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपासून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sourav ganguly opens up on virat kohli and rohit sharma odi captaincy issue
'विराटने नकार दिला म्हणून...'; कर्णधारपद काढून घेण्याची गांगुलीने सांगितली पूर्ण कहानी


गांगुली आणि मुख्य निवड समितीने देखील विराट कोहलीशी याबाबत चर्चा केली होती. रोहित शर्माला कर्णधार बनविल्यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीने आतापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

वाचा-भारतीय संघात आणखी एका जागेसाठी स्पर्धा सुरू; रोहित शर्माचा...

एएनआय वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणामध्ये गांगुली म्हणाले की, "हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने एकत्र मिळून घेतला आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केली होती, पण तो सहमत नव्हता. आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार असणे चुकीचे आहे, असे निवड समितीला वाटते.'

गांगुली पुढे म्हणाला, 'विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार राहील आणि रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपात कर्णधार राहिल, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत मी बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून आणि मुख्य निवड समितीने देखील विराटला हे सांगितले आहे. "


"रोहित शर्माच्या नेतृत्व क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे, याची बीसीसीआयला खात्री आहे. मर्यादित षटकांत कर्णधार म्हणून विराट कोहलीने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो," असेही गांगुली यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, एकदिवसीय संघाचा कर्णधार केल्यानंतर रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधारही करण्यात आले आहे. संघ निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तीन कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

महत्वाचे लेख