गुवाहाटी : ट्वेन्टी-२० सामन्यात तुफानी फलंदाजी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ सूर्यकुमार यादवने आजच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दाखवून दिला. सूर्याच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने २३७ धावांचा डोंगर उभारत यावेळी विजयाचा पाया रचला. सूर्यकुमारने यावेळी तुफानी फटकेबाजी करत २२ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६१ धावांची वादळी खेळी साकारली.
भारताने या सामन्यात झोकात फलंदाजीला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली. राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि आपले इरादे यावेळी स्पष्ट केले. रोहित आणि राहुल यांनी त्यानंतर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहितने यावेळी ३७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाला असला तरी राहुल मात्र दमदार फलंदाजी करत होता. राहुलने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुल जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. राहुलने यावेळी २८ चेंडूंमध्ये २८ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली.
राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. कारण सूर्याने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सूर्याला झटपट धावा जमवता आल्या. सूर्याने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने यावेळी फक्त १८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याचे अर्धशतक झाल्यावर कोहली पण जोरदार फटकेबाजी करायला लागला. त्यामुळे कोहली आणि सूर्या यांनी यावेळी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी यावेळी गोलंदाजांना आपल्या पुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि १८व्या षटकातच संघाच्या २०० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारतीय संघ यावेळी किती धावा उभारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भारताने या सामन्यात झोकात फलंदाजीला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली. राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि आपले इरादे यावेळी स्पष्ट केले. रोहित आणि राहुल यांनी त्यानंतर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहितने यावेळी ३७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाला असला तरी राहुल मात्र दमदार फलंदाजी करत होता. राहुलने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुल जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. राहुलने यावेळी २८ चेंडूंमध्ये २८ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली.
राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. कारण सूर्याने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सूर्याला झटपट धावा जमवता आल्या. सूर्याने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने यावेळी फक्त १८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याचे अर्धशतक झाल्यावर कोहली पण जोरदार फटकेबाजी करायला लागला. त्यामुळे कोहली आणि सूर्या यांनी यावेळी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी यावेळी गोलंदाजांना आपल्या पुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि १८व्या षटकातच संघाच्या २०० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारतीय संघ यावेळी किती धावा उभारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.