अ‍ॅपशहर

मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या अझरला प्रत्येक रनसाठी मिळणार इतके रुपये...

syed mushtaq ali trophy mohammed azharuddeen बीसीसीआयद्वारे आयोजित सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केरळच्या मोहम्मद अझरूद्दीनने ३७ चेंडूत केलेल्या वादळी शतकानंतर...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2021, 4:13 pm
तिरुवनंतपूरम: syed mushtaq ali trophy सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या लढतीत केरळचा युवा सलामीवीर मोहम्मद अझरूद्दी (mohammed azharuddeen)ने याने ३७ चेंडूत शतक झळकावले आणि भारताकडून तिसऱ्या जलद शतकाची नोंद केली. अझरच्या या स्फोटक खेळीमुळे सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. त्याच बरोबर त्याला बक्षीस देखील मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अझर


वाचा- इंग्लंडच्या क्रिकेटपटूला करोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण; श्रीलंकेत खळबळ उडाली

मुंबई सारख्या तगड्या संघाविरुद्ध अझरने केलेल्या शतकासाठी केरळ क्रिकेट संघाने त्याचा बक्षीस देण्याचे ठरवले आहे. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १९६ धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईचा विजय मिळेल असे वाटत होते. पण अझरने मुंबईच्या स्वप्नावर पाणी फेरले. मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. अझरने फक्त ३७ चेंडूत शतक झळकावले आणि केरळला १५.५ षटकात ८ विकेट राखून विजय मिळून दिला.

वाचा- 'गावस्कर तुम्ही काहीही बोला, मला फरक पडत नाही'

मुंबईविरुद्धच्या सामन्यात अझरने ५४ चेंडूत ९ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १३७ धावा केल्या. केरळ क्रिकेट संघाने अझरला १ लाख ३७ हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. आता तुम्हाला वाटेल की बक्षिसाची रक्कम अशी का? साधारणपणे ही रक्कम एक लाख किंवा दीड लाख अशी असते. पण केरळ क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अझरच्या एका धावेसाठी एक हजार या प्रमाणे आम्ही त्याला १ लाख ३७ हजार इतकी रक्कम देणार आहोत.

वाचा- चौथी कसोटी सुरू होण्याच्या २४ तास आधी ऑस्ट्रेलिया बसला मोठा धक्का

केरळ क्रिकेट संघाचे सचिव श्रीजीत व्ही नायर यांनी एएनआयला सांगितले की, केरळसाठी हा एक शानदार क्षण आहे. म्हणूनच आम्ही त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील हे पहिलेच शतक ठरले आहे.

वाचा- मोहम्मद अझरूद्दीनची स्फोटक फलंदाजी; फक्त ३७ चेंडूत वादळी शतकी खेळी

युवा फलंदाज अझरूद्दीनने २०१५ साली प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरूवात केली होती. त्याने २२ सामन्यात ९५९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अझरने २१ सामन्यात ४०४ धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्धचे शतक हे त्याचे टी-२०मधील पहिले शतक आहे. त्याने अद्याप एकही अर्धशतक केले नाही. या वादळी शतकी खेळीत त्याने प्रत्येकी ८ चौकार आणि षटकार मारले. ३७ चेंडूत त्याने फक्त चार चेंडूवर धाव काढली नाही. ५४ चेंडूत अझरने ९ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १३७ धावा केल्या आणि संघाला विजय मिळून दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज