नवी दिल्ली : ‘टी-२० क्रिकेट हा काहींसाठी धंदा झाला आहे,’ असे मत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केले. त्याचबरोबर त्याने कसोटी हेच मूळ क्रिकेट आहे. त्यातीलच कामगिरीची सर्वोत्तम दखल घेतली जाते, असेही त्याने सांगितले.
क्रिकेट जगतातील अव्वल संघांनीच कसोटी खेळावी. मर्यादित षटकांच्या लढतीद्वारे क्रिकेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार शक्य आहे, अशी सूचना रवी शास्त्री यांनी केली होती. हे स्टोक्सला पूर्ण मान्य नाही. ‘शास्त्री यांचे मत काही प्रमाणात योग्य आहे. फ्रँचाईज क्रिकेट वाढत आहे. फ्रँचाईज आता विविध लीगमधील संघांची खरेदी करीत आहेत. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेतील लीग बघितल्यास हेच लक्षात येईल. विविध देशातील काही खेळाडू अनेक फ्रँचाईज संघातून खेळत आहेत. काहींकडे अनेक फ्रँचाईज संघांची मालकी आहे. त्यांच्यासाठी टी-२० हा एक प्रकारचा धंदाच झाला आहे,’ असे स्टोक्सने सांगितले. फ्रँचाईजचे संघ असणे हे एक प्रकारे चांगलेच आहे. खेळाडूंना पूर्वीपेक्षा जास्त संधी मिळत आहे. त्यांचे भविष्य जास्त सुरक्षीत होत आहे. क्रिकेटमधील पैसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खेळाडूंची कारकीर्द कमी होत आहे. त्यामुळे शक्य आहे, तेवढ्या कालावधीत खेळाडू जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात, याकडेही स्टोक्सने लक्ष वेधले. टी-२०मुळे खेळाचे स्वरुप बदलले आहे; पण अजूनही कसोटी महत्वाची आहे. कसोटी संपलेली नाही. ती अजूनही महत्त्वाची आहे, हे दाखवून देण्याची जबाबदारी माझ्यासह अनेक खेळाडूंवर आहे, असेही स्टोक्स म्हणाला.
आयपीएलचा निर्णय
इंग्लंड संघाच्या कार्यक्रमानुसारच आयपीएल सहभागाबाबत निर्णय घेणार असल्याचे स्टोक्सने सांगितले. कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने यापूर्वीच वन-डे क्रिकेटचा निरोप घेतला आहे. ‘मी चार वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. यात मला जगातील सर्वोत्तम खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते. मात्र, सध्या माझ्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यालाच माझी पसंती असेल,’ असे स्टोक्सने सांगितले.
वनडे चाळीस षटकांची?वनडे सध्याच्या ५०ऐवजी चाळीस षटकांची खेळवण्याची सूचना स्टोक्सने केली. टी-२० ऐवजी हंड्रेड लढतीचा पर्याय आला आहे. त्याचप्रमाणे वनडे लढत ५० ऐवजी ४० षटकांची करता येईल. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये प्रो-४० सामने होत असत. षटके कमी झाल्यास खेळाडूंवरील ताणही कमी होईल, याकडे स्टोक्सने लक्ष वेधले.
क्रिकेट जगतातील अव्वल संघांनीच कसोटी खेळावी. मर्यादित षटकांच्या लढतीद्वारे क्रिकेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार शक्य आहे, अशी सूचना रवी शास्त्री यांनी केली होती. हे स्टोक्सला पूर्ण मान्य नाही. ‘शास्त्री यांचे मत काही प्रमाणात योग्य आहे. फ्रँचाईज क्रिकेट वाढत आहे. फ्रँचाईज आता विविध लीगमधील संघांची खरेदी करीत आहेत. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेतील लीग बघितल्यास हेच लक्षात येईल. विविध देशातील काही खेळाडू अनेक फ्रँचाईज संघातून खेळत आहेत. काहींकडे अनेक फ्रँचाईज संघांची मालकी आहे. त्यांच्यासाठी टी-२० हा एक प्रकारचा धंदाच झाला आहे,’ असे स्टोक्सने सांगितले. फ्रँचाईजचे संघ असणे हे एक प्रकारे चांगलेच आहे. खेळाडूंना पूर्वीपेक्षा जास्त संधी मिळत आहे. त्यांचे भविष्य जास्त सुरक्षीत होत आहे. क्रिकेटमधील पैसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खेळाडूंची कारकीर्द कमी होत आहे. त्यामुळे शक्य आहे, तेवढ्या कालावधीत खेळाडू जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात, याकडेही स्टोक्सने लक्ष वेधले. टी-२०मुळे खेळाचे स्वरुप बदलले आहे; पण अजूनही कसोटी महत्वाची आहे. कसोटी संपलेली नाही. ती अजूनही महत्त्वाची आहे, हे दाखवून देण्याची जबाबदारी माझ्यासह अनेक खेळाडूंवर आहे, असेही स्टोक्स म्हणाला.
आयपीएलचा निर्णय
इंग्लंड संघाच्या कार्यक्रमानुसारच आयपीएल सहभागाबाबत निर्णय घेणार असल्याचे स्टोक्सने सांगितले. कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने यापूर्वीच वन-डे क्रिकेटचा निरोप घेतला आहे. ‘मी चार वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. यात मला जगातील सर्वोत्तम खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते. मात्र, सध्या माझ्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यालाच माझी पसंती असेल,’ असे स्टोक्सने सांगितले.
वनडे चाळीस षटकांची?वनडे सध्याच्या ५०ऐवजी चाळीस षटकांची खेळवण्याची सूचना स्टोक्सने केली. टी-२० ऐवजी हंड्रेड लढतीचा पर्याय आला आहे. त्याचप्रमाणे वनडे लढत ५० ऐवजी ४० षटकांची करता येईल. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये प्रो-४० सामने होत असत. षटके कमी झाल्यास खेळाडूंवरील ताणही कमी होईल, याकडे स्टोक्सने लक्ष वेधले.