अ‍ॅपशहर

धोनीमुळे जाणार विराटची विकेट? इंग्लंडनं आखला रनमशीन कोहलीला बाद करण्याचा मास्टरप्लान

t20 world cup 2022: टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होत आहे. दुपारी दीड वाजता ऍडलेड ओव्हलवर उपांत्य फेरीचा सामना रंगेल. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्ताननं अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2022, 12:34 pm
ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होत आहे. दुपारी दीड वाजता ऍडलेड ओव्हलवर उपांत्य फेरीचा सामना रंगेल. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्ताननं अंतिम फेरीत धडक मारली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat and dhoni


इंग्लंडला आजच्या सामन्यात सर्वाधिक धोका विराट कोहलीकडून असेल. कोहलीनं विश्वचषक स्पर्धेत धावांची टाकसाळ उघडली आहे. त्यामुळे कोहलीला लवकर बाद करण्याचा प्रयत्न इंग्लंडचे गोलंदाज करतील. यासाठी खास योजना आखण्यात आल्याचं इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनं सांगितलं.

मोईन अली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. स्पर्धेत त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. नॉकआऊट सामने कसे खेळतात हे मी महेंद्र सिंह धोनी आणि ड्वेन ब्राव्होकडून शिकलो असल्याचं अलीनं सांगितलं. चेन्नईकडून खेळताना मी बरंच काही शिकलो. वरिष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंना कसं तयार करतात हे मला सीएसकेमध्ये पाहायला मिळालं. बाद फेरीच्या सामन्यात हा अनुभव कामी येईल, असं अली म्हणाला.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी
उपांत्य फेरीत कोहलीला रोखण्यासाठी इंग्लंडच्या संघानं खास रणनीती आखल्यानं अलीनं सांगितलं. आम्ही धावा रोखण्यासाठी, विकेट्स काढण्यासाठी योजना आखली आहे. मोईन अली आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला आहे. आरसीबीकडून तो तीन सीझन्स खेळला आहे. इंग्लंडच्या संघातील ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली आणि आदिल रशीद कोहलीला दोन-दोनदा बाद केलं आहे. तर मोईननं कोहलीला टी-२० मध्ये एकदा बाद केलं आहे.
Ind Vs Eng सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तरी टीम इंडियाचं फायनलचं तिकीट पक्कं, पाहा कसं?
कोहली फुल फॉर्मात

टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर आहेत. सुपर १२ राऊंडमध्ये कोहलीनं ५ सामन्यांत १२३ च्या सरासरीनं आणि १३८.९८ च्या स्ट्राईक रेटनं २४६ धावा केल्या आहेत. भारतीय संघानं अगदी आरामात उपांत्य फेरी गाठली. टीम इंडियाच्या वाटचालीत कोहलीचा मोठा वाटा आहे. या स्पर्धेत कोहलीनं तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज