अ‍ॅपशहर

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी...

भारतीय संघाचा पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव झाला आहे, त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात येऊ शकतात. कारण गेल्या सामन्यात २०० धावांचा पल्ला गाठूनही भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात कोणते बदल होऊ शकतात, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 11 Jun 2022, 6:13 pm

हायलाइट्स:

  • पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.
  • त्यामुळे आता दुसरा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा असेल.
  • या महत्वाच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार, जाणून घ्या...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतीय संघ (सौजन्य-ट्विटर)
कटक : भारताला पहिल्या सामन्यात दोनेश धावांचा टप्पा डगाठूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता दुसरा सामना भारताला जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल होऊ शकतात.
पहिला बदल...
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत बदल होणार नाहीत, तर दोन्ही बदल हे गोलंदाजीमध्ये होतील, हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमरान मलिकला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत. पण उमरानला संधी द्यायची असेल तर कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढायचे, हे पाहावे लागणार आहे. भुवनेश्वर कुनारकडे सर्वात जास्त अनुभव आहे, त्यामुळे त्याला संघातून बाहेर काढणार नाही. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात अवेश खानने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात उमरानला संधी द्यायची असेल तर हर्षल पटेलला संघाबाहरे केले जाऊ शकते. कारण हर्षलने गेल्या सामन्यात चार षटकांमध्ये ४३ धावा दिल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी हर्षलला संघाबाहेर करत उमरानला संधी दिली जाऊ शकते.
दुसरा बदल...भारताच्या गोलंदाजीतील दुसरा बदल हा फिरकीपटूमध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यात अक्षर पटेल हा महागडा ठरला होता. कारण गेल्या सामन्यात चार षटकामध्ये त्याने ४० धावा दिल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी त्याला संघाबाहेर केले जाईल आणि अक्षरच्या जागी भारतीय संघात रवी बिश्नोईला संधी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत. कारण रवी हा मिस्ट्री स्पिनर आहे. रवीचे चेंडू नेमकं कसे आणि कुठे वळतात, हे अजूनपर्यंत बऱ्याच फलंदजांना समजत नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी रवीला संघात संधी देण्यात येऊ शकते. गेल्या सामन्यात हार्दिकने एक षटक टाकले होते आणि त्यामध्ये त्याने १८ धावा दिल्या होत्या. भारताकडून सर्वात महागडा गोलंदाज तोच ठरला होता. पण हार्दिकने दमदार फलंदाजी केल्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम राहणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज