अ‍ॅपशहर

राहुल द्रविडची सटकली; 'संघाच्या अंतर्गत गोष्टीत तुमचा काय संबंध, हस्तक्षेप करू नका'

Rahul Dravid Team India Captaincy: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कर्णधारपदावरून एक प्रश्न विचारण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2021, 5:24 pm
सेंच्युरियन: भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून सुरू झालेला वाद अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला हटवल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेले वक्तव्य आणि विराटने आफ्रिका दौऱ्यावर येण्याआधी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यात मोठा फरक होता. यामुळे विराट विरुद्ध गांगुली असे चित्र तयार झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india captaincy is internal issue team media should not interfere in it said head coach rahul dravid
राहुल द्रविडची सटकली; 'संघाच्या अंतर्गत गोष्टीत तुमचा काय संबंध, हस्तक्षेप करू नका'


वाचा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी काय झाले जाणून घ्या..

भारत आणि दक्षिण आफिका यांच्यात आज रविवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी फक्त राहुल द्रविड उपस्थित होता. साधारणपणे पत्रकार परिषदेला मुख्य कोचसह कर्णधार देखील उपस्थित असतो. या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर राहुल द्रविडने सडेतोड उत्तर दिले.

वाचा- पहिल्या कसोटीत विराटने दिला धक्का; पदार्पणात धमाका करणाऱ्या खेळाडूला दिला डच्चू

गेल्या काही दिवसात कर्णधारावरून सुरू असलेल्या वादावर जेव्हा द्रविडला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, कर्णधारपदाबाबत काहीही असेल तर तो संघाचा अंतर्गत विषय आहे. हा विषय माध्यमांसाठी किंवा जनतेसाठीचा नाही. भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा हे निवडण्याचे काम निवड समितीचे आहे. मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार हवेत की नको याबाबत मी काही बोलणार नाही. कर्णधारपदाबाबत बोलण्याची ही योग्य जागा आणि वेळ नाही. संघाच्या आत जी चर्चा होते की मी कोणत्याही परिस्थितीत बाहेर सार्वजनिक करणार नाही.

वाचा- रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळणार का? फिटनेसबाबत आली मोठी अपडेट


विराटने वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण त्याला वनडे आणि कसोटीत नेतृत्व करायचे होते. मात्र बीसीसीआयने टी-२० पाठोपाठ वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. हा बदल करत असताना विराटला विश्वासात घेतल्याचे गांगुलीने म्हटले होते. जेव्हा पत्रकार परिषदेत विराटला याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने कसोटी संघाची घोषणा करण्याच्या दीड तास आधी वनडे संघाचे नेतृत्व तु करणार नाहीस असे सांगितले. यावरून विराट, निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे समोर आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज