बर्मिंगहम : दमदार फलंदाजी साकारत भारताने इंग्लंडपुढे ३७८ धावांचे आव्हान दिले होते, त्यावेळी भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण इंग्लंडने दमदार फलंदाजी करत भारताची गोलंदाजी निष्प्रभ केली आणि सात विकेट्स राखत दमदार विजय साकारला. इंग्लंडने जर हा सामना गमावला असता तर त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली असती. कारण या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ हा मालिकेत १-२ असा पिछाडीवर होता. त्यामुळे हा सामना जिंकत त्यांनी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सलामी दिली होती. अॅलेक्स लीस आणि झॅक क्रॉली यांनी १०७ धावांची सलामी देत इंग्लंडसाठी विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतके झळकावत इंग्लंडच्या या पायावर दमदार कळस चढवला. रुट आणि बेअरस्टो या दोघांनी चौथ्या दिवसापासून भारताच्या गोलंदाजीवर धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात झाली होती. भारताच्या विजयात ही जोडीच मोठा अडसर ठरत असल्याचे दिसत होते. पण भारतीय गोलंदजांना या दोघांनाही बाद करण्यात अपयश आले आणि तिथेच इंग्लंडच्या बाजूने सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.
भारताने या सामन्यात एकदा जोरदार पुनरागमन केले होते. कारण एकेकाळी इंग्लंडची बिनबाद १०६ अशी अवस्था होती. त्यानंतर १०७ धावांवर इंग्लंडचा पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर फक्त दोन धावांत भारताने इंग्लंडला अजून दोन धक्के दिले होते आणि त्यांची ३ बाद १०९ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारताला या सामन्यात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यावेळी रुट आणि बेअरस्टो यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांना विकेट मिळण्यापासून दूर ठेवले. भारताच्या गोलंदाजांनी सामना जिंकण्यासाठी काही काळ शर्थीचे प्रयत्न केले, पण हे सर्व प्रयत्न रुट आणि बेअरस्टो यांनी यशस्वी होऊ दिले नाहीत. रुट आणि बेअरस्टो यांनी पाचव्या दिवशी तर भारताच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला आणि इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेअरस्टोने तर पहिल्या डावातही शतक झळकावले होते. दुसऱ्या डावातही त्याने पुन्हा शतक झळकावले. पण दुसऱ्या डावात बेअरस्टोपेक्षा जो रुट हा आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. रुटने या दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलला.
भारताने या सामन्यात एकदा जोरदार पुनरागमन केले होते. कारण एकेकाळी इंग्लंडची बिनबाद १०६ अशी अवस्था होती. त्यानंतर १०७ धावांवर इंग्लंडचा पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर फक्त दोन धावांत भारताने इंग्लंडला अजून दोन धक्के दिले होते आणि त्यांची ३ बाद १०९ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारताला या सामन्यात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यावेळी रुट आणि बेअरस्टो यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांना विकेट मिळण्यापासून दूर ठेवले. भारताच्या गोलंदाजांनी सामना जिंकण्यासाठी काही काळ शर्थीचे प्रयत्न केले, पण हे सर्व प्रयत्न रुट आणि बेअरस्टो यांनी यशस्वी होऊ दिले नाहीत. रुट आणि बेअरस्टो यांनी पाचव्या दिवशी तर भारताच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला आणि इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेअरस्टोने तर पहिल्या डावातही शतक झळकावले होते. दुसऱ्या डावातही त्याने पुन्हा शतक झळकावले. पण दुसऱ्या डावात बेअरस्टोपेक्षा जो रुट हा आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. रुटने या दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलला.