Icc Womens Cricket World Cup, नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात अखेर भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. पण त्यासाठी भारतीय संघाला नेमकं काय करावं लागेल, या गोष्टीचे नवे समीकरणही आता समोर आले आहे.
भारतीय संघ कसा उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, पाहा समीकरण...ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाचपैकी पाचही सामने जिंकले असून त्यांनी थेट उपांत्य फेरीत मजल मारली आहे. दुसरीकडे भारतीय संघाचेही पाच सामना झाले आहेत. या पाच सामन्यांमध्ये भारतीय संघाला दोन विजय मिळवता आले आहेत, तर त्यांना न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता चार गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताला विश्वचषकात अजून दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा आगामी सामना २२ मार्चला बांगलादेशबरोबर होणार आहे, तर रविवारी २७ मार्चला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. भारतीय संघाला जर उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना हे दोन्ही सामने फक्त जिंकून चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने हे सामना जिंकावे लागतील. कारण जेव्हा उपांत्य फेरीसाठी अखेरच्या सामन्यांपूर्वी जोरदार चुरस पाहायला मिळेल तेव्हा विजयाबरोबरच रनरेट जास्त असणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघ एकवेळ बांगलादेशला पराभूत करू शकतो, असे म्हटले जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा चांगलाच तुल्यबळ आहे. भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड समजले जात आहे. कारण गुणतालिकेत ते आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, त्याचबरोबर त्यांनी या विश्वचषकात चारपैकी तारही सामेन जिंकले आहेत, एकही पराभव त्यांच्या पदरी पडलेला नाही. त्यामुळे या विश्वचषकात भारताला जर उपांत्य फेरीच पोहोचायचे असेल तर त्यांना दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल. पण त्यापूर्वी त्यांना २२ मार्चला होणाऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करावे लागेल. जर भारताला बांगलादेशविरुद्धचा सामना गमवावा लागला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
भारतीय संघ कसा उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, पाहा समीकरण...ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाचपैकी पाचही सामने जिंकले असून त्यांनी थेट उपांत्य फेरीत मजल मारली आहे. दुसरीकडे भारतीय संघाचेही पाच सामना झाले आहेत. या पाच सामन्यांमध्ये भारतीय संघाला दोन विजय मिळवता आले आहेत, तर त्यांना न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता चार गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताला विश्वचषकात अजून दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा आगामी सामना २२ मार्चला बांगलादेशबरोबर होणार आहे, तर रविवारी २७ मार्चला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. भारतीय संघाला जर उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना हे दोन्ही सामने फक्त जिंकून चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने हे सामना जिंकावे लागतील. कारण जेव्हा उपांत्य फेरीसाठी अखेरच्या सामन्यांपूर्वी जोरदार चुरस पाहायला मिळेल तेव्हा विजयाबरोबरच रनरेट जास्त असणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघ एकवेळ बांगलादेशला पराभूत करू शकतो, असे म्हटले जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा चांगलाच तुल्यबळ आहे. भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड समजले जात आहे. कारण गुणतालिकेत ते आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, त्याचबरोबर त्यांनी या विश्वचषकात चारपैकी तारही सामेन जिंकले आहेत, एकही पराभव त्यांच्या पदरी पडलेला नाही. त्यामुळे या विश्वचषकात भारताला जर उपांत्य फेरीच पोहोचायचे असेल तर त्यांना दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल. पण त्यापूर्वी त्यांना २२ मार्चला होणाऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करावे लागेल. जर भारताला बांगलादेशविरुद्धचा सामना गमवावा लागला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.