बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना कसा जिंकायचा, याचा मास्टर प्लॅन भारतीय संघाला आता ठरलेला आहे. कारण विजयासाठी इंग्लंडला नेमके किती धावांचे आव्हान द्यायचे, हेदेखील भारतीय संघाने आता ठरवल्याचे समोर आले आहे.
भारतीय संघाचा मास्टर प्लॅन नेमका आहे तरी काय, जाणून घ्या...
पहिल्या डावात भारताने जेव्हा १३२ धावांची आघाडी घेतली होती, त्यानंतर भारतीय संघामे आपला मास्टर प्लॅन तयार केला होता. या मास्टर प्लॅननुसार भारतीय संघाने आता काही गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या मास्टर प्लॅननुसार भारतीय संघ ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे आता पाहायला मिळत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी सांगितले की, " जेव्हा आम्ही दुसऱ्या डावाता फलंदाजीला उतरणार होतो, तेव्हाच संघाचा मास्टर प्लॅन रेडी झाला होता. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आम्ही बेसिक्स गोष्टींवर लक्ष देण्याचे ठरवले होते. कारण जेव्हा तुम्ही बेसिक्सवर लक्ष देता तेव्हा तुमच्याकडून फार कमी चुका घडत असतात. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरताना आम्ही ही गोष्ट ठरवली होती. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघापुढे आव्हान किती ठेवायचे, हेदेखील आम्ही यावेळी ठरवले होते."
भारतीय संघ किती धावांचे आव्हान इंग्लंडला देणार, याबाबत सिराजने यावेळी सांगितले की, " पहिल्या डावात आम्ही शतकी आघाडी घेतली होती. त्याच्या जोरावर आम्ही इंग्लंडपुढे विजयासाठी किती धावांचे आव्हान ठेवायला हवे, हे आम्ही ठरवले होते. इंग्लंडपुढे विजयासाठी आम्ही किमान ३५० धावांचे आव्हान ठेवायचे हे ठरवले होते. पण त्यापेक्षा जेवढ्या जास्त धावा होतील, त्या आमच्यासाठी नक्कीच बोनस असतील."
भारताने उपहारापर्यंत ७ बाद २२९ अशी मजल मारली होती. त्यावेळी भारताने ३६१ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताने आपले पहिले टार्गेट पूर्ण केले आहे. पण भारतीय संघ एवढ्यावर आपला डाव घोषित करेल, असे वाटत नाही. भारतीय संघ दुसरा डाव सोडण्यापेक्षा यामध्ये अजून किती धावांची भर घातली जाईल, यावर बर देतील. त्यामुळे भारतीय संघ सर्व फलंदाजांना मैदानात उतरेल किंवा जेव्हा भारतीय संघ ४५० धावा करेल तेव्हा ते डावाची घोषणा करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण त्यासाठी रवींद्र जडेजाची भूमिका आता महत्वाची असेल. कारण सध्याच्या घडीला जडेजा हा एकमेव बिनीचा फलंदाज मैदानात आहे. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
भारतीय संघाचा मास्टर प्लॅन नेमका आहे तरी काय, जाणून घ्या...
पहिल्या डावात भारताने जेव्हा १३२ धावांची आघाडी घेतली होती, त्यानंतर भारतीय संघामे आपला मास्टर प्लॅन तयार केला होता. या मास्टर प्लॅननुसार भारतीय संघाने आता काही गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या मास्टर प्लॅननुसार भारतीय संघ ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे आता पाहायला मिळत आहे.
भारतीय संघ किती धावांचे आव्हान इंग्लंडला देणार, याबाबत सिराजने यावेळी सांगितले की, " पहिल्या डावात आम्ही शतकी आघाडी घेतली होती. त्याच्या जोरावर आम्ही इंग्लंडपुढे विजयासाठी किती धावांचे आव्हान ठेवायला हवे, हे आम्ही ठरवले होते. इंग्लंडपुढे विजयासाठी आम्ही किमान ३५० धावांचे आव्हान ठेवायचे हे ठरवले होते. पण त्यापेक्षा जेवढ्या जास्त धावा होतील, त्या आमच्यासाठी नक्कीच बोनस असतील."
भारताने उपहारापर्यंत ७ बाद २२९ अशी मजल मारली होती. त्यावेळी भारताने ३६१ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताने आपले पहिले टार्गेट पूर्ण केले आहे. पण भारतीय संघ एवढ्यावर आपला डाव घोषित करेल, असे वाटत नाही. भारतीय संघ दुसरा डाव सोडण्यापेक्षा यामध्ये अजून किती धावांची भर घातली जाईल, यावर बर देतील. त्यामुळे भारतीय संघ सर्व फलंदाजांना मैदानात उतरेल किंवा जेव्हा भारतीय संघ ४५० धावा करेल तेव्हा ते डावाची घोषणा करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण त्यासाठी रवींद्र जडेजाची भूमिका आता महत्वाची असेल. कारण सध्याच्या घडीला जडेजा हा एकमेव बिनीचा फलंदाज मैदानात आहे. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.